कांदळी (जिल्हा पुणे) येथे श्रीराम जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या कांदळी, तालुका जुन्नर (जिल्हा पुणे) येथील आश्रमात प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीराम जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

माझ्या सरकारचे यश सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

वर्ष २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आल्यानंतर डॉ. सावंत यांनी आजच्याच दिवशी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्या निमित्ताने . . .

गोवा : अटल सेतू पूल वाहतुकीसाठी अंशत: खुला

अटल सेतूचा पणजी-म्हापसा भाग पुढील ५ दिवसांत, एकेरी वाहतूक २ एप्रिल या दिवशी, तर सर्व वाहतुकीसाठी हा पूल १० ते १२ एप्रिलपर्यंत खुला करण्यात येणार आहे. डागडुजीच्या कामामुळे अटल सेतू पूल काही दिवस वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता.

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने उत्तर आणि ईशान्‍य भारतात ‘हिंदु नववर्ष’निमित्ताने ‘ऑनलाईन’ विशेष कार्यक्रम पार पडला !

या कार्यक्रमात ‘हिंदु नववर्ष चैत्र शुक्‍ल प्रतिपदा या दिवशी साजरे का केले जाते ? या दिवशी ब्रह्मध्‍वज म्‍हणजेच गुढी का उभारली जाते ? आणि ती उभारण्‍याची योग्‍य पद्धत’, यांसह अन्‍य शास्‍त्रीय माहिती विशद करण्‍यात आली.

भविष्यात सर्वांना ‘वृक्षरक्षक’ बनावे लागेल ! – धीरज वाटेकर, पर्यटन-पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते

आपण स्वतःहून एखाद्या कुंडीत किंवा भूमीत बियाणे घालून झाड लावून ते जगवण्याचा प्रयत्न केल्यास ते झाड आपल्याशी हितगुज करत असल्याचे जाणवेल. यातून आपल्याला निसर्गाशी एकरूप होता येईल, ‘वृक्षरक्षक’ होता येईल.

भारतीय कुटुंबव्यवस्था ही जगात सर्वोत्कृष्ट ! – मेग जोन्स

जगातील अनेक देशांमध्ये महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली केवळ कागद काळे-पांढरे करण्यात येत आहेत; मात्र भारत सरकारने महिलांसाठी अनेक योजना चालू करून प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर दिला आहे – जे विदेशी लोकांना कळते, ते येथील पुरो(अधो)गामी आणि सुधारणावादी यांना कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असेल !

गोवा : मये येथे २२ ते २८ मार्च गोमातेवरील शास्त्रीय ज्ञानावर आधारित संवादात्मक कार्यक्रम

या अनोख्या; पण उपयुक्त अशा व्याख्यानमालेसाठी नागरिक, शेतकरी, दूध उत्पादक, पर्यटन व्यावसायिक, महिला बचत गट इत्यादी सर्वांनी सिकेरी गोशाळेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन गोमंतक गोसेवक महासंघाने केले आहे.

आसाममध्ये ६०० मदरसे बंद केले आणि सर्वच बंद करण्याचा मानस !

जर आसामचे मुख्यमंत्री असे करू शकतात, तर अन्य राज्यांतील मुख्यमंत्री का करू शकत नाहीत ?

सिंधुदुर्ग : अंनिसच्या कार्यक्रमांना शाळांमधून कार्यक्रम घेण्यास अनुमती देणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करा !

वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्याच्या गोंडस नावाखाली हिंदु धर्म, त्यातील चालीरिती, प्रथा-परंपरा, देवता, संत, धर्मग्रंथ यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह टीका करण्यात आल्याने एका संबंधित स्थानिक प्रशासनावर हे कार्यक्रम रहित करण्याची वेळ आली होती.

उत्तर प्रदेश : चैत्र नवरात्रीला प्रत्येक जिल्ह्यात दुर्गा सप्तशतीचे पठण होणार !

उत्तरप्रदेश शासनाने सर्व जिल्ह्यांतील सर्व देवीची मंदिरे आणि शक्तीपीठे यांमध्ये चैत्र नवरात्रीला दुर्गा सप्तशतीचे पठण अन् देवीचे जागरण आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. यासमवेतच अखंड रामायण पठणाचे आयोजन करण्यासही सांगितले आहे.