माणगंगा नदीपात्रातील ८०० वर्षांपूर्वीच्या स्नानकुंडाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष !

स्नानकुंडातील पवित्र तिर्थाचे आध्यात्मिक स्तरावर अनेक लाभ आहेत. तीर्थाचा भाविकांना लाभ होण्यासाठी प्रशासनाने त्याचा जीर्णाेद्धार लवकर करावा, ही अपेक्षा !

संत तुकाराम महाराज यांच्या बीजोत्सवासाठी २९ मार्चला देहू (जिल्हा पुणे) येथे उपस्थित रहावे !

कोरोनाच्या नावाखाली सरकार सर्रास तीर्थक्षेत्रांवरील यात्रा आणि सांप्रदायिक सप्ताह बंद करत आहे, हे अयोग्य !

मोक्षपुरी हरिद्वार : स्थानमहात्म्य !

मनुष्यजन्माचे सार्थक मोक्षप्राप्तीतच आहे आणि त्यासाठी काय करावे, याचा मार्ग सांगणार्‍या हिंदु धर्माने अयोध्या, मथुरा, माया (हरिद्वार), काशी, कांचीपूरम्, अवंतिका (उज्जैन), द्वारिकापुरी या ७ मोक्षदायी नगरी सांगितल्या आहेत.

कुणकेश्‍वर यात्रा रहित; मात्र नित्योपचार चालू रहाणार ! – पालकमंत्री उदय सामंत

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कुणकेश्‍वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रेच्या नियोजनाविषयी देवस्थानच्या विश्‍वस्तांसह पालकमंत्री सामंत यांनी आढावा बैठक घेतली. या वेळी ते बोलत होते.

माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांनी घेतले श्री तुळजाभवानीदेवीचे दर्शन

शिवसेनेचे नेते, तसेच माजी मंत्री रामदास कदम यांनी त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम आणि युवासेना कोअर टीमचे सदस्य सिद्धेश कदम यांच्यासह २३ फेब्रुवारी या दिवशी श्री तुळजाभवानीमातेचे दर्शन घेतले. दर्शनानंतर कदम कुटुंबियांचा मंदिर संस्थानच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला.

श्री साई संस्थानने लाडू-प्रसाद पुन्हा चालू करावा ! – भाविकांची मागणी

शिर्डी येथील काही व्यावसायिकांनी आपल्या दुकानात थेट लाडू विक्री चालू केली आहे. या दुकानदारांकडून एका पाकिटात ४ लाडू बांधून भाविकांना चढ्या दरात विक्री केली जात असल्याने भाविक अप्रसन्नता व्यक्त करत आहेत.

राज्यातील आध्यात्मिक आणि तीर्थक्षेत्र पर्यटनाला शासन चालना देणार ! – आदित्य ठाकरे, पर्यटनमंत्री

तीर्थक्षेत्रांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. श्रीक्षेत्र निरा नृसिंहपूर (पुणे) तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी २८ कोटी ४८ लाख रुपये निधीचे वितरण होणार !

अयोध्या येथील राममंदिर जगाची सांस्कृतिक राजधानी बनेल ! – मिलिंद परांडे

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने अयोध्येतील राममंदिर निर्माण कार्य आता गतिमान झाले आहे. अयोध्येतील राममंदिर संपूर्ण जगाची सांस्कृतिक राजधानी बनेल, असा विश्‍वास विश्‍व हिंदु परिषदेचे अखिल भारतीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला. 

१५ वर्षांनंतर प्रथमच शनिशिंगणापूर ग्रामपंचायतीत सदस्यांची निवड बिनविरोध

बाहेरचे राजकारणी दिशाभूल करत असल्याने आम्ही युवक भरकटलो होतो. गडाख यांच्यामुळे नवीन विश्‍वस्त सर्वसमावेशक निवडले आणि ग्रामपंचायतही बिनविरोध झाली, असे नूतन सदस्य बाळासाहेब कुर्‍हाट यांनी सांगितले.

श्री महालक्ष्मी मंदिरातील दुकानदारांकडून देवस्थान समिती कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांचा सत्कार

सौ. वैशाली क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे १ जानेवारीपासून ही दुकाने खुली करण्यास अनुमती देण्यात आली. त्यामुळे मंदिराच्या आवारातील दुकानदारांच्या शिष्टमंडळाने २ जानेवारी या दिवशी देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर यांची भेट घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला.