मुंबईमध्ये पित्याकडून मुलीवर बलात्कार, उज्जैन येथे गुन्हा नोंद

श्रेष्ठतम हिंदु संस्कृतीचे शिक्षण आणि त्यानुसार आचरण यातूनच नीतीमान समाज घडू शकतो !

माजी कृषीमंत्री शरद पवारांच्या मनातले मोदींनी करून दाखवले ! – देवेंद्र फडणवीस, भाजप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा कृषी कायद्याला समर्थन दिले मात्र काहींची राजकीय दुकानदारी बंद होईल म्हणून याला विरोध करण्यात आला.

लातूर येथे बनला पहिला रेल्वे कोच

मराठवाड्यातील लातूर शहरातील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये पहिला रेल्वे कोच शेल सिद्ध करण्यात आला आहे. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर हा पहिला कोच शेल पूर्णत्वाने साकार करण्यात आला.

आंध्रप्रदेशातील श्रीशैलम् मंदिरावर धर्मांधांनी नियंत्रण मिळवले आहे ! – भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांचा आरोप

एका मंदिरावर धर्मांध नियंत्रण मिळवतात आणि हिंदू गप्प बसतात, हे संतापजनक ! अनेक शतके धर्मांध हिंदूंवर अत्याचार करत असूनसुद्धा हिंदूंच्या वृत्तीत पालट न झाल्याने म्हणजे साधनेचे आध्यात्मिक बळ न वाढवल्याने त्यांची झालेली ही दुःस्थिती !

भाजपच्या आमदाराने पूजेच्या ठिकाणी असलेली पूजा सामग्री लाथेने उडवली !

जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे हुतात्मा स्मारकाच्या भूमीपूजनाचे निमंत्रण न दिल्याने आमदाराची कृती ! भाजपच्या आमदारांकडून असे घडणे अपेक्षित नसून अशा प्रकारांमुळे समाजात चुकीचा संदेश जाईल, हे निश्‍चित !

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करून देहलीत चालू झाली चालकविरहित मेट्रो !

देहलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या स्वयंचलित म्हणजे चालकविरहित मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. या मेट्रो ट्रेनला पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही मेट्रो ३७ किमीपर्यंत धावणार आहे. या मेट्रोला संपूर्णपणे ऑटोमॅटिक सिस्टिम आहे. मेट्रोच्या ‘मॅजेन्टा लाइन’ आणि ‘पिंक लाइन’ यांवर ही मेट्रो चालवली जाणार आहे.

काश्मीरमध्ये एका पसार पोलीस अधिकार्‍यासह ८ आतंकवाद्यांना अटक

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट झालेला नाही, उलट तेथील काही जिहादी वृत्तीचे पोलीस आतंकवाद्यांना जाऊन मिळाले आहेत. आतंकवाद्यांचा कारखाना असणार्‍या पाकला नष्ट केल्याविना हा आतंकवाद थांबणार नाही !

(म्हणे) ‘मी चाकूद्वारे पंतप्रधान मोदी यांना मारेन !’ – शेतकरी आंदोलनामधील एका महिलेची धमकी

शेतकरी आंदोलन कोणत्या दिशेने जात आहे, हेच यातून लक्षात येते ! सरकारने अशांना शोधून त्यांच्यावर तात्काळ  कारवाई करणे आवश्यक आहे आणि याप्रकरणी शेतकरी संघटनांनीही स्पष्टीकरण द्यायला हवे !

उज्जैन (मध्यप्रदेश) येथे हिंदुत्वनिष्ठांवर दगडफेक करणार्‍या धर्मांधाचे अवैध घर पालिकेकडून उद्ध्वस्त !

हे घर बांधेपर्यंत पोलीस आणि नगरपालिका यांचे अधिकारी झोपले होते का ? जर या घरावरून दगडफेक झाली नसती, तर पोलीस आणि नगरपालिका यांनी अशी कारवाई केली नसती ! अवैध घरांकडे दुर्लक्ष करणार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे !

सीबीआयने अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांची हत्या कि आत्महत्या याच्या अन्वेषणाचे निष्कर्ष घोषित करावेत ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

सीबीआयने अभिनेते सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या अन्वेषणास प्रारंभ करून आता जवळपास ५ मास झाले आहेत; मात्र त्याची हत्या झाली होती कि त्याने आत्महत्या केली ? याचा सीबीआयने अजून उलगडा केलेला नाही.