अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांचा मंत्रालयावर मोर्चा !

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला प्रतिक्रिया देतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना अश्लील शिवी दिली होती. याच्या निषेधार्थ १५ नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी मंत्रालयावर मोर्चा काढला.

बळजोरी केल्यास आम्ही गप्प बसणार नाही ! – सतेज पाटील, आमदार, काँग्रेस

गायरान भूमीवर ग्रामस्थांनी केलेले अतिक्रमण नसून ती त्यांच्या अधिकाराची भूमी आहे. शहरी भागाला वेगळा आणि ग्रामीण भागाला वेगळा न्याय असे का ? आमच्या सरकारने वर्ष २०२२ मध्ये काढलेला शासकीय अध्यादेश अंतिम मानून गायरान भूमीची जागा गावठाण हद्दवाढ म्हणून संमत करावी.

पंबाजमधील शिवसेनेचे नेते सुधीर सूरी यांची हत्या करणार्‍या खलिस्तानवाद्यावर शिखांनी उधळली फुले !

यावरून पंजाबमधील स्थिती किती वाईट झाली आहे, हे स्पष्ट होते ! याला आताच पायबंद घातला नाही, तर भविष्यात निर्माण होणारी भयावह स्थिती निस्तारणे कुठल्याही सरकारच्या आवाक्यात नसेल !

पुणे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा धडक मोर्चा !

एफ्.आर्.पी. (फिक्स्ड रिझर्व्ह प्राईस ) म्हणजेच राखीव किंमत मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येथील अलका चौक ते साखर आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

भोर येथे ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍यांच्या विरोधात मोर्चा

मोर्चातील तरुणांनी भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांना भोर बस स्थानकाशेजारील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर वरील मागण्यांचे निवेदन दिले.

बंगालमध्ये भाजपच्या मोर्च्यावर देशी बाँबने आक्रमण : स्फोटात २ कार्यकर्ते घायाळ

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात बंगाल ‘बाँब बनवण्याचा कारखाना’ बनला आहे. तेथील कायदा आणि सुव्यस्थेचे तीन तेरा वाजल्याने आता तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणे अपरिहार्य !

गुजरातमध्ये ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात भव्य मोर्चा

गुजरातमधील बनासकांठा येथे अलीकडेच ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला. राज्यातील सत्ताधारी भाजपचे आमदार शशिकांत पंड्या यांनी हा मोर्चा आयोजित केला होता. इतर अनेक हिंदु संघटनांनीही त्यांना पाठिंबा दिला. या मोर्च्यामध्ये १० सहस्रांहून अधिक लोक सहभागी झाले होते.

श्रीरामपूर (नगर) येथे ‘लव्ह जिहाद’ विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक !

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात मोठ्या प्रमाणात मोर्चा निघणे, हे हिंदू जागृत होत असल्याचे द्योतक ! ‘लव्ह जिहाद’ची समस्या आतंकवादी आक्रमणापेक्षाही गंभीर बनत आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शोधून शिक्षा होणे आवश्यक !

‘श्री योग वेदांत सेवा समिती’च्या वतीने पुणे येथे संयुक्त मूक मोर्चाचे आयोजन

संस्कृती रक्षणाचे अद्वितीय कार्य करणारे संत श्री आसाराम बापू यांना न्याय मिळण्याची मागणी

राजभवनाकडे मोर्चा नेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ठाणे पोलिसांच्या कह्यात !

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात ‘राजस्थानी आणि गुजराती नसतील, तर मुंबईत पैसाच रहाणार नाही’, असे म्हटले होते. या विधानावरून राज्यात मोठा गदारोळ झाला.