
इचलकरंजी, (जिल्हा कोल्हापूर), २२ डिसेंबर (वार्ता.) – ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतराचे वाढते प्रकार देशविघातक आहेत. त्यामुळे शासनाने ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर विरोधात कायदा करावा, या मागणीसाठी समस्त हिंदु समाजाच्या वतीने इचलकरंजी येथे २५ डिसेंबरला हिंदु जनआक्रोश मोर्च्याचे आयोजन केले आहे. हा मोर्चा दुपारी ३ वाजता राजर्षी शाहू महाराज पुतळ्यापासून प्रारंभ होणार असून मुख्य मार्गावरून गांधी पुतळा येथे पोचल्यावर मान्यवरांच्या मार्गदर्शनाने मोर्च्याची सांगता होईल. याच्या जनजागृतीसाठी बैठका, मेळावे चालू आहेत. या मोर्च्यासाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. गजानन महाजनगुरुजी आणि श्री. शिवप्रसाद व्यास यांनी पत्रकार परिषदेत केले. या वेळी सर्वश्री सनतकुमार दायमा, प्रवीण सामंत, सुजित कांबळे, मंगेश मस्कर, प्रसाद जाधव, सोमेश्वर वाघमोडे, बाळासाहेब ओझा, अरविंद शर्मा, गिरीश खुरबुडे, कुलदीप जैन, अमित कुंभार यांसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)