सरकारी कर्मचार्‍यांसाठी ‘दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना’ पुन्हा चालू करा ! – जॉन नाझारेथ, गोवा फॉरवर्ड

गेल्या वर्षीपासून सरकारी कर्मचार्‍यांसाठी ही योजना रहित करण्यात आली होती.

वरवरा राव यांच्या जामिनाच्या याचिकेवर १४ डिसेंबर या दिवशी सुनावणी

शहरी नक्षलवादाच्या प्रकरणी अटकेत असलेले लेखक वरवरा राव यांनी आरोग्याच्या कारणास्तव जामिनाच्या मागणीसाठी केलेल्या याचिकेवर १४ डिसेंबरला या दिवशी सविस्तर सुनावणी घेण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला सामोरे जाण्याची गोव्याने सिद्धता ठेवावी ! – डॉ. शिवानंद बांदेकर, डीन, गोवा वैद्यकीय महाविद्यालय

डीन डॉ. शिवानंद बांदेकर पुढे म्हणाले, ‘‘कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत; मात्र कोरोनाची दुसरी लाट गोव्यात येऊ नये, यासाठी प्रत्येकाने कोरोनाची लक्षणे जाणवल्यास त्वरित उपाय करणे, आदींच्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजेत.

सौ. उषा तुळशीदास नाईक यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांची मुलगी सौ. स्वाती रामा गावकर यांना जाणवलेली सूत्रे

‘माझी आई चांगल्या गतीला गेली कि नाही ?’ हे मला स्वप्नात कळू दे.’ त्या रात्री मला स्वप्न पडले. मला आईच्या हातावर पुष्कळ चकाकणारे दैवी कण दिसले आणि त्या दैवी कणांकडे आई स्मितवदनाने पहात होती. ती आनंदी दिसत होती.

आयुर्वेद औषध ‘आयुष-६४’च्या क्लिनिकल चाचणीमध्ये ७० टक्के रुग्ण कोरोनामुक्त

कोरोनाबाधितांवर आयुर्वेदाचे औषध असणार्‍या ‘आयुष-६४’चे परिणाम समोर आले आहेत. ३० पैकी २१ म्हणजे ७० टक्के रुग्ण ५ दिवसांनंतर कोरोनामुक्त झाले. ही चाचणी जयपूर येथील राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेकडून करण्यात आली.

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे-करजगी यांची आत्महत्या

आत्महत्येच्या ८ घंट्यांपूर्वी सकाळी ५.४५ वाजता डॉ. शीतल यांनी ‘युद्ध आणि शांतता’ नावाचे स्वत: काढलेले चित्र ‘ट्विटर’वर ‘पोस्ट’ केले आहे.

लोक मास्कच योग्य पद्धतीने घालत नसतील, तर दिशानिर्देशांचा काय लाभ ? – सर्वोच्च न्यायालय

‘‘केवळ दिशानिर्देश ठरवून चालणार नाही, त्यांची कार्यवाहीही आवश्यक आहे. यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा.’’ हे न्यायालयाला का सांगावे लागते ? केंद्र सरकारला ते कळत का नाही ? कि ‘दिशानिर्देश दिले की, आपले काम संपले’, असे सरकारला वाटते ?

धर्मादाय रुग्णालयांमध्ये नियमाप्रमाणे १० टक्के गरीब रुग्णांना उपचार द्यावेत ! – ग्रामविकासमंत्री

शहर आणि राज्य यांतील धर्मादाय रुग्णालयांमध्ये १० टक्के गरीब रुग्णांना विनामूल्य उपचारावरील नियमांचे पालन करून उपचार द्यावेत, असे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.

लेप्टोस्पायरोसिस, अतीसार, मलेरिया आणि डेंग्यू या आजारांविषयी सतर्क रहा ! – डॉ. महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी, सिंधुदुर्ग

ताप, अंगदु:खी, थंडी वाजणे, स्नायूवेदना होणे, लघवी पिवळी होणे आदी लक्षणे असलेल्या रुग्णांनी त्वरित उपचार घ्यावेत.

केवळ गोरगरीब नव्हे, तर कुणाकडूनही शासकीय रुग्णालयांत पैसे घेऊ नये !

‘गोरगरिबांच्या सेवेसाठी शासकीय रुग्णालये आहेत. त्यामुळे शासकीय रुग्णालयात कुठल्याही गरीब व्यक्तीकडून पैसे घेण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील डॉक्टरांनी करू नये. तसे झाल्यास त्याचे वाईट परिणाम होतील, अशी चेतावणी भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी दिली आहे.’