जनतेला स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांत शिस्तच शिकवली नसल्याने आणि आरोग्यविषयीचे गांभीर्यच न बिंबवल्याने आज कोरोना संकटाच्या वेळी त्याचे दुष्परिणाम उघडपणे दिसत आहेत. याला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !

नवी देहली – बहुतांश लोक मास्कच योग्य पद्धतीने घालत नसतील, तर अशा दिशानिर्देशांचा काय लाभ ?, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने अप्रसन्नता व्यक्त केली. गुजरातमधील राजकोट येथे कोरोना रुग्णालयातील आगीत ६ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची सुनावणी करतांना न्यायालयाने ही अप्रसन्नता व्यक्त केली. न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत सुनावणी चालू केली आहे. २७ नोव्हेंबरला या रुग्णालयात आग लागली होती.
Five coronavirus patients were killed after a fire broke out in the ICU of a designated #Covid19 hospital in Gujarat’s Rajkot in the early hours of Friday. https://t.co/oawoIGZ1pb
— Deccan Herald (@DeccanHerald) November 27, 2020
१. न्यायालयाने म्हटले की, आम्ही विवाह सोहळे आणि राजकीय सभा पहात आहोत. त्यात ६० टक्क्यांहून अधिक लोक मास्क घालत नाहीत. जे घालत आहेत, त्यांचे मास्क गळ्यातच लटकत आहेत. तुम्हाला समजले पाहिजे की, ही कोरोनाची दुसरी लाट आहे. असेच चालू राहिल्यास पुढे स्थिती आणखी बिघडत जाईल.

२. केंद्र सरकारचे अधिवक्ता तुषार मेहता म्हणाले, ‘‘आगीच्या घटनांविषयी आधीच राज्य सरकारांना दिशानिर्देश जारी केले आहेत. आता नव्याने ते जारी केले जातील.’’ त्यावर न्यायालयाने म्हटले, ‘‘केवळ दिशानिर्देश ठरवून चालणार नाही, त्यांची कार्यवाहीही आवश्यक आहे. यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा.’’ (हे न्यायालयाला का सांगावे लागते ? केंद्र सरकारला ते कळत का नाही ? कि ‘दिशानिर्देश दिले की, आपले काम संपले’, असे सरकारला वाटते ? – संपादक)
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’