निवडणुकीमध्ये लव्ह जिहाद, गोहत्याबंदी यांसाठी कार्य करणार्‍या उमेदवारांना त्यांची जातपात न पाहता निवडून देणे आवश्यक ! – मुन्ना कुमार शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय हिंदू महासभा, नवी देहली

येत्या निवडणुकीमध्ये  लव्ह जिहाद, गोहत्याबंदी यांसाठी कार्य करणार्‍या उमेदवारांना त्याची जातपात न पाहता निवडून दिले पाहिजे. एक दिवस या देशात हिंदु राष्ट्र येईल, तेव्हा आपले राष्ट्र जगभरात बलवान होईल.

छोट्या संघटनांना एकत्र करून हिंदुत्वाचे कार्य करायला हवे ! – पू. रामबालक दासजी महात्यागी महाराज, संचालक, श्री जामडी पाटेश्‍वरधाम सेवा संस्थान, पाटेश्‍वर धाम, छत्तीसगड

जे धर्मांतरित झाले त्यांना दूर न लोटता त्यांना प्रेमाने जवळ करायला हवे. असे केल्यास हिंदूंचे धर्मांतर होणार नाही. प्रभु श्रीराम यांनी वनवासाच्या काळात वानरांसह वनवासींना प्रेम देऊन आपल्या कार्यात जोडून घेतले. प्रभु श्रीरामांचा आदर्श घेऊन आपणाला कार्य करायचे आहे.

धर्मांतर रोखून सनातन धर्माचे रक्षण करू, अशी प्रतिज्ञा करा ! – पू. चित्तरंजन स्वामी महाराज, शांती काली आश्रम, अमरपूर, त्रिपुरा

मठ-मंदिरांमध्ये अनेक साधू-संत आहेत; परंतु तेथे येणार्‍या हिंदूंना धर्माचे शिक्षण दिले जात नसल्याने धर्मांतराची समस्या फोफावली आहे. हिंदु धर्म वाचला, तर मठ-मंदिरे टिकणार आहेत. त्यामुळे प्रथम हिंदु धर्म वाचवण्यासाठी प्रयत्न करा.

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी भारताने बांगलादेश सरकारवर दबाव निर्माण करावा ! – अजय सिंह, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, वर्ल्ड हिंदू फेडरेशन

बांगलादेशातील हिंदु मुलींवर प्रतिदिन बलात्कार होत आहेत, मंदिरे तोडली जात आहेत, तसेच हिंदूंच्या भूमी लुटल्या जात आहेत. हिंदू अक्षरश: गुलामीचे जीवन जगत आहेत. ते कमकुवत आणि भयभीत झाले आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे उद्गार त्यांनी काढले

शीख, जैन, बौद्ध यांनी ‘हिंदु’ आहोत, हे समजून घ्यायला हवे ! – कर्नल करतार सिंह मजीठिया, कृपाल रूहानी फाऊंडेशन, गोवा

धर्माच्या रक्षणासाठी हिंदूंना कुणावरही अवलंबून रहाता येणार नाही. हिंदु धर्म आणि मंदिरे यांवर आक्रमण करणार्‍यांना हिंदूंनी सोडू नये. हिंदूंनी कुणावर आक्रमण करू नये; मात्र स्वत:च्या रक्षणासाठी हिंदूंना सिद्ध रहायला हवे.

वीरशैव लिंगायत हे हिंदूच ! – पू. श्री.ष.ब्र.प्र.१०८ (डॉ.) विरुपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी, मठाधिपति, गणाचार्य मठ संस्थान, मुखेड, नांदेड, महाराष्ट्र

अखंड हिंदुस्थान हे हिंदु राष्ट्रच आहे; परंतु त्याला ‘सेक्युलर’ ठरवले जात आहे. भारतातील संप्रदाय हिंदु धर्माप्रमाणे आचरण करतात. त्यामुळे सर्व जण हिंदूच आहेत.

‘हलाल’मधून हिंदूंचा पैसा आतंकवादी कारवायांसाठी जात आहे ! – कपिल मिश्रा, संस्थापक, हिंदु ईकोसिस्टम

‘हलाल’च्या माध्यमातून हिंदूंच्या विरोधात ‘अर्थव्यवस्था’ निर्माण झाली आहे. यामुळे राष्ट्र आणि हिंदु धर्मविरोधी शक्तींचे जाळे संपूर्ण देशभर पसरले आहे. या संकटाच्या विरोधात लढण्यासाठी हिंदूंनी जातींमधील भेद विसरून एकत्र यायला हवे.

नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळे दुबई येथील हिंदु उद्योगपतीला जिहाद्यांकडून धमकी !

भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्याच्या प्रकरणी दुबई येथील हिंदु उद्योगपती किरण कारूकोंडा यांना जिहादी कट्टरतावाद्यांनी सामाजिक माध्यमांतून धमकी दिली.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या प्रथम दिनी ‘हिंदू समाजाचे रक्षण’ या विषयावरील उद्बोधन सत्रात मान्यवरांनी मांडलेले ओजस्वी विचार !

देशाची प्रगती तर होत आहे; मात्र इंजिन बंद पडलेल्या विमानाप्रमाणे आपण भरकटलो आहोत. बौद्धिक क्षमता वाढली आहे; परंतु हृदय छोटे झाले आहे. भारतात ८० टक्के हिंदू आहेत; परंतु त्यांच्यातील किती हिंदूंमध्ये हिंदुत्व जिवंत आहे ?

अमेरिकेचा पुढील राष्ट्रपती निवडण्याची शक्ती येथील हिंदूंकडे ! – खासदार रिचर्ड मॅककॉर्मिक

अमेरिकेच्या संसदेत वेदिक मंत्रोच्चारात पार पडली पहिली हिंदु-अमेरिकी परिषद