हिजाबप्रेमींना दणका !

हिजाबप्रेमींना दणका !

यातून बोध घ्यायचा म्हणजे जसजसे हिंदूंचे संघटन वाढत आहे, हिंदू जागृत होत आहेत, तसतसे हिंदुविरोधी अधिक सतर्क होऊन काही ना काही निमित्त काढून धर्मांध कारवाया करत आहेत. न्यायालयही सत्य स्थिती पुढे आणत आहे. हिंदूंनीही संघटितपणे वैध मार्गाने वैचारिक प्रतिवाद करत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेपर्यंत संघर्ष करत राहिले पाहिजे !

युद्ध चालू आहे !

युद्ध चालू आहे !

भारताने पोखरणमध्ये दुसर्‍यांदा अणूबाँबचे परीक्षण केल्यावर जगाने भारतावर, विशेष करून अमेरिकेने भारतावर अनेक निर्बंध घातले; मात्र त्याचा भारतावर विशेष काही परिणाम झाला नाही, ही वस्तूस्थिती आहे. तसेच रशियाचे झाल्यास आश्चर्य वाटू नये. रशियाकडे इंधन आणि गॅस हे हुकूमाचे एक्के आहेत. त्यांच्या बळावरच रशिया अमेरिका आणि युरोप यांना खेळवणार आहे, हे नक्की !

मरणासन्न काँग्रेस !

मरणासन्न काँग्रेस !

काँग्रेस आता शेवटची घटका मोजत आहे. ‘काँग्रेसला आता राजकीयदृष्ट्या संपवायचे’, असा निश्चय हिंदूंनी केला आहे. या निर्णयात ते पालट करणार नसल्यामुळे हा पक्ष लवकरच इतिहासजमा होईल, हे निश्चित !

आक्रमकांच्या स्मृती पुसाच !

आक्रमकांच्या स्मृती पुसाच !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील ‘औरंगाबाद’ शहराचे नाव ‘संभाजीनगर’ करण्याची मागणी केली; परंतु आजपर्यंतच्या कुठल्याही शासनकर्त्यांना ती पूर्ण करता आली नाही. आज त्याच शिवसेनाप्रमुखांचा पक्ष महाराष्ट्रात सत्तेत आहे. त्यामुळे या सरकारच्या कारकीर्दीत तरी शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण होईल, अशी आशा आहे.

हिंदुद्वेषी ‘अल्-जजीरा’ !

हिंदुद्वेषी ‘अल्-जजीरा’ !

भारत सरकारने ‘अल्-जजीरा’ची काळी बाजू वेळीच लक्षात घेऊन तिच्यावर कायमस्वरूपी बंदी घालायला हवी. इस्लामी महत्त्वाकांक्षेच्या बळावर भारताची अपकीर्ती करणार्‍या ‘अल्-जजीरा’ला रोखठोक प्रत्युत्तर दिले तरच अन्य विदेशी प्रसारमाध्यमांकडून केल्या जाणार्‍या भारतविरोधी वृत्तांकनाला आळा बसेल !

हा हिंदुत्वाचा विजय !

हा हिंदुत्वाचा विजय !

देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज लागला. मतदारांचा एकूणच कल पहाता यंदाच्या निवडणुकीत आक्रमक आणि रोखठोक हिंदुत्व अन् राष्ट्रीयत्व यांना बहुमत मिळाले आहे, असे सहजच दिसून येते.

हिंदूंच्या वंशविच्छेदाचे दडपलेले सत्य !

हिंदूंच्या वंशविच्छेदाचे दडपलेले सत्य !

जगातील एकाही देशात आतंकवादाचे उदात्तीकरण होत नाही; पण भारतात मात्र ते सर्रासपणे होते. तेव्हा कुणीही अशा चित्रपटांना विरोध करत नाही. मग काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारलेल्या या चित्रपटालाच विरोध का ? हा दडपलेला इतिहास जगासमोर का येऊ दिला जात नाही ? या सर्व प्रश्नांची उत्तरे या चित्रपटातच आहेत !

समाजात प्रस्थापित होणारे अयोग्य आदर्श ?

समाजात प्रस्थापित होणारे अयोग्य आदर्श ?

हिंदु धर्मासाठी प्राणत्याग करणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखे उदाहरण तर जगात अन्यत्र कुठेच नसेल ! हे असे आदर्श सोडून हिंदु समाज अयोग्य आदर्शांच्या मागे का धावत आहे ? याच्या मुळाशी गेल्यास लहानपणापासून धर्मशिक्षण नसणे, घरात आई-वडिलांकडून योग्य संस्कार नसणे हेच म्हणावे लागेल !

भ्रष्टाचाराचे ‘चित्रां’कन !

भ्रष्टाचाराचे ‘चित्रां’कन !

चित्रा रामकृष्ण यांनी स्वतःची कुशाग्र बुद्धी आणि क्षमता विधायक कार्यासाठी न वापरता विघातक कामांसाठी वापरली. असे ‘बुद्धीवान’ भ्रष्टाचारी हे भारतीय व्यवस्थेसाठी अधिक धोकादायक आहेत, हे लक्षात घ्या !

वैद्यकीय शिक्षणातील अडचणी !

वैद्यकीय शिक्षणातील अडचणी !

भारतातील वैद्यकीय शिक्षणाची ही स्थिती युक्रेन-रशियाच्या युद्धामुळे प्रकर्षाने लक्षात येत आहे. भारतात पूर्वापार आयुर्वेदाचे शिक्षण मिळत आहे; मात्र त्याच्याकडे आणि अन्य वैद्यकीय शाखांच्या अभ्यासक्रमांकडे कुत्सित दृष्टीने पाहिले जाते.