Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आरोप

नवी देहली – उत्तरदायित्व आणि शैक्षणिक सुधारणा यांची मागणी करणार्‍या विद्यार्थ्यांना भविष्यातील योग्य हितधारक म्हणून मान्यता देण्याऐवजी मोदी सरकार त्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते. विद्यार्थी रास्त मागण्या घेऊन रस्त्यावर उतरले असतांना सरकार त्यांच्या धैर्याला भ्याडपणाने आणि अन्याय्य वर्तन करून प्रतिसाद देत आहे, असा आरोप काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला.

संसदेसमोर मोदी प्रशासनाविरुद्ध निदर्शने करतांना काँग्रेसचे अध्यक्ष आणि इतर

एका इंग्रजी वर्तमानपत्रात ‘शिक्षण व्यवस्थेचा र्‍हास, तरुण भारताचा आघात’ हा लेख लिहून त्यांनी हे आरोप केले.

गांधी यांनी पुढे लिहिले की,

१. देशभरातील विद्यार्थी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटणे आणि ढासळत्या शिक्षणव्यवस्थेच्या विरोधात शांततापूर्ण आंदोलने करत आहेत. त्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत – सरकारने उत्तरदायित्व सुनिश्चित करावे आणि शिक्षणात सुधारणा घडवून आणाव्यात.

सोनिया गांधी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेला लेख –

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

२. मोदी सरकारने एकूण अर्थसंकल्पात शालेय शिक्षणाचा वाटा ५० टक्क्यांनी आणि उच्चशिक्षणाचा वाटा ३३ टक्क्यांनी अल्प केला. गेल्या १२ वर्षांत सरकारने अनुमाने १ लाख सरकारी शाळा बंद केल्या, तर ४३ सहस्र खासगी शाळा उघडल्या. यांपैकी मोठा भाग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्याशी संलग्न संघटनांद्वारे चालवला जातो. (राष्ट्रप्रेमी संघाच्या शाळा चालू होणे, याचा गांधी यांना पोटशूळ आहे. – संपादक)

३. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तरुणांना चांगल्या नोकर्‍यांच्या संधी मिळत नाही. असे असूनही शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संसदीय समितीच्या शिफारसी फेटाळून लावल्या आणि अशा मोठ्या घटनांनंतरही त्यागपत्र देण्यास नकार दिला. (काँग्रेस ६ दशके सत्तेवर होती. त्या वेळी तिने काय केले, हे गांधी का सांगत नाहीत ? – संपादक)

४. देहली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यांनी आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांना दडपण्यासाठी लाठीमार, अश्रुधूर अन् पेलेट गन यांसारख्या हिंसेचा वापर केला. या हिंसाचारात अनेक निरपराध विद्यार्थी घायाळ झाले.

संपादकीय भूमिका

  • अशा प्रकारे राजकारण करणार्‍या सोनिया गांधी यांच्यात विद्यार्थ्यांच्या समस्यांविषयी कधीच कळवळा निर्माण होऊ शकत नाही, हेच खरे !
  • विद्यार्थ्यांवर आक्रमण करणे पूर्णत: अयोग्य आहेच. तथापि विद्यार्थी आंदोलनाला हिंसक बनवण्याचा प्रयत्न काँग्रेस, साम्यवादी, मुसलमान संघटना, राष्ट्रविरोधी घटक करत असतांना सरकारला त्यावर आवर घालणे आवश्यक आहे !
  • विद्यार्थ्यांनो, तुमच्यावर अन्याय झाला, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे, परंतु त्यावर काँग्रेस राजकारण करत आहे, हेसुद्धा विसरू नका !