मनीला (फिलीपिन्स) येथील ‘आसियान’ देशांच्या बैठकीत परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांचे आवाहन

(‘आसियान’ म्हणजे दक्षिण-पूर्व आशियातील देशांची संघटना. यात ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश आहे.)
मनीला (फिलीपिन्स) – आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण असले पाहिजे. आतंकवादी कृत्यांचे परिणाम भोगावेच लागतील, यात शंका नाही. आतंकवादाला खतपाणी घालणार्या आर्थिक साहाय्य रोखण्याला आपण प्राधान्य दिले पाहिजे. यात कोणताही निष्काळजीपणा करू नये, असे आवाहन भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे आयोजित ३३ व्या ‘आसियान रीजनल फोरम’मध्ये मंत्रीस्तरीय बैठकीला संबोधित करतांना केले. यासह आंतरराष्ट्रीय नौका वाहतूक मार्ग सुरक्षित आणि उघडे रहातील, याची निश्चिती करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
आंतरराष्ट्रीय जलमार्गांद्वारे होणारा व्यापार सुरक्षित रहायला हवा !
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील संघर्षग्रस्त भागांत व्यावसायिक नौकांवर होणार्या आक्रमणांवर डॉ. जयशंकर म्हणाले की, सागरी वाहतूक आणि नागरी पायाभूत सुविधा यांवरील आक्रमणे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाहीत. आंतरराष्ट्रीय जलमार्गांद्वारे होणारा व्यापार सुरक्षित आणि कोणत्याही अडथळ्यांविना चालू राहिला पाहिजे. या आक्रमणांमध्ये भारतीय खलाशांचाही मृत्यू झाला आहे.
Bangladesh President Resigns : बांगलादेशाचे राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांचे त्यागपत्र
Recognize Israel : नागरी अणू करारासाठी सौदी अरेबियाने इस्रायलला मान्यता द्यावी !
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !
Bangladesh Foreign Affairs Minister : (म्हणे) ‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत त्याच्या लोकांच्या समस्यांकडे लक्ष देईल, अशी आशा !’
Siliguri Corridor : सिलीगुडी कॉरिडॉर आता ‘चिकन नेक’ राहिलेला नाही, तर ‘एलिफंट्स ट्रंक’ बनला !
अमेरिकेने भारतावर लादले १० टक्के अतिरिक्त आयात शुल्क