कुतूबमिनार नव्हे, सूर्यस्तंभ !

देश ‘स्वच्छ’ होण्याचा ध्यास घेतलेले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आता पुरातत्व विभागही स्वच्छ करण्यासाठी हा विभाग विसर्जित करून तेथे धर्मनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ, खऱ्या इतिहासतज्ञांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. असे झाल्यास भारताचा दैदिप्यमान इतिहास जगासमोर येण्यास वेळ लागणार नाही आणि हिंदु राष्ट्राच्या दिशेने टाकलेले ते एक पाऊलच असेल !

पर्यटकांना औरंगजेबाच्या थडग्याला ५ दिवस देता येणार नाही भेट !

केवळ ५ दिवसच कशाला ? क्रूरकर्म्याच्या थडग्याला भेट देण्याचा प्रकार कायमचाच बंद करा !

देहलीतील जामा मशिदीच्या पायर्‍यांखाली हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती असून त्या बाहेर काढाव्यात !

आता हिंदूंमध्ये जागृती होऊ लागल्याने ‘ही धार्मिक स्थळे परत मिळावीत’, अशी मागणी ते करू लागले आहेत. हे लक्षात घेऊन आता केंद्र सरकारनेच या सर्व वास्तू हिंदूंना परत मिळण्यासाठी पावले उचलणे आवश्यक !

ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग आढळले, त्याप्रमाणे गोव्यातही आढळू शकते ! – सुदिन ढवळीकर, वीजमंत्री

‘पोर्तुगीज काळात जी मंदिरे लुप्त झाली होती, त्या मंदिरांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे’, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. ही मंदिरे पुन्हा उभारावी, असे केवळ माझे वैयक्तिक मत नसून सर्वांचीच तशी भावना आहे.’’

अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर कारवाई करण्याची मराठा महासंघ आणि शिवप्रेमी यांची मागणी

मराठा महासंघ १९ मेनंतर ओवैसी यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार नोंद करणार आहे, अशी माहिती मराठा महासंघाचे जिल्हा संयोजक तथा सकल मराठा समाजाचे अध्यक्ष अधिवक्ता सुहास सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केवळ काशीच नव्हे, तर बळकावलेली ३६ सहस्र मंदिरे पुन्हा मिळवल्याविना हिंदू थांबणार नाहीत ! – सुरेश चव्हाणके, सुदर्शन न्यूज

आताही आपण मंदिरे उभी करत आहोत; पण मंदिरांच्या रक्षणासाठी आपण काय व्यवस्था उभी करणार आहोत ? याचा विचार हिंदूंनी करायला हवा. इतिहासात झालेल्या चुका पुन्हा होता कामा नयेत.

पुरातत्वीय उदासीनता !

ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भातही पुरातत्व विभागाची भूमिका काय ? न्यायालयात सर्वेक्षणाची मागणी केल्यानंतर ते करण्यात आले. पुरातत्व विभागाने ते स्वतःहून का नाही केले ? ऐतिहासिक वारशांचे केवळ जतन करणे पुरेसे नसते, तर त्या वारशाशी निगडित दबलेला सत्य इतिहास समोर आणण्याचे कर्तव्यही पुरातत्व विभागाचे नाही का ? भारतात तर हे फार महत्त्वाचे आहे !

सर्वेक्षणाचा विस्तृत अहवाल सादर करण्यास २ दिवसांची मुदत

‘एकूण ३ दिवस सर्वेक्षण, चित्रीकरण झाले. २५० छायाचित्रे काढण्यात आली आहेत. त्यामुळे प्राथमिक अहवाल सादर केला जाऊ शकतो; मात्र या सर्वांचा विस्तृत अहवाल सादर करण्यासाठी २ दिवस लागतील’, असे सांगत मुदत मागितली. त्याला न्यायालयाने मान्यता दिली.

कुतूबमिनार आणि ताजमहाल केंद्र सरकारने हिंदूंकडे सोपवावे ! – काँग्रेस नेते प्रमोद कृष्णम यांची मागणी

काँग्रेसचे राज्य असतांना काँग्रेसने असे का केले नाही आणि कृष्णम यांनी इतकी वर्षे हे का सांगितले नाही ?

श्रीकृष्णजन्मभूमी मंदिराच्या भूमीवर असलेल्या शाही ईदगाह मशिदीतील गर्भगृहही सील करावे ! – हिंदु पक्षाची मागणी

या ठिकाणी मुसलमान पक्षाकडून छेडछाड केली जाऊ नये, यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे येथे संरक्षण देण्याची मागणी याचिकाकर्ते महेंद्र प्रताप सिंह यांनी केली आहे.