कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोकण विभागात ‘वॉर रूम’ (आपत्ती नियंत्रण कक्ष) स्थापन

शासनाच्या सूचनेनुसार कोरोना प्रतिबंधासाठी कोकण विभागाने पाचही जिल्ह्यांत आवश्यक त्या सर्व उपाययोजना आणि नियोजन केले आहे. राज्यात प्रथमच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य, फळे, भाजीपाला यांच्या वाहतूक नियंत्रणासाठी ‘वॉर रूम’ (आपत्ती नियंत्रण कक्ष)…

देहलीतील इस्लामी धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना कोरोना झाल्याच्या शक्यतेवरून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न

काही दिवसांपूर्वी मुसलमानांच्या ‘तबलीगी जमाती’ने एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात देश आणि विदेश येथून उपस्थित राहिलेले  धर्मगुरु आणि अन्य लोक परत त्यांच्या घरी गेले. यातील काही लोकांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इटलीमध्ये ५ सहस्रहून अधिक वैद्यकीय कर्मचारी कोरोना ‘पॉझिटिव्ह’

इटलीमध्ये आतापर्यंत ५ सहस्रहून अधिक डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, रुग्णवाहिका कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचारी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोकण विभागात जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूक नियंत्रणासाठी ‘वॉर रूम’ (आपत्ती नियंत्रण कक्ष) स्थापन

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य, फळे, भाजीपाला यांच्या वाहतूक नियंत्रणासाठी ‘वॉर रूम’ (आपत्ती नियंत्रण कक्ष) स्थापन करण्यात आली आहे. या ‘वॉर रूम’साठी १८००२ ६७८४६६ हा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे.

खासगी डॉक्टरांनी चिकित्सालये बंद ठेवून रुग्णांची असुविधा करू नये ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

कोरोनाबाधित रुग्णांच्या व्यतिरिक्त अन्यही रुग्ण डॉक्टरांकडे येत असतात. त्यामध्ये वयोवृद्ध, महिला, मुले असतात. त्यांची असुविधा होऊ नये, यासाठी खासगी डॉक्टरांनी स्वत:ची चिकित्सालये बंद करू नयेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवर १४ एप्रिलपर्यंत बंदी

केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत देशभरात दळणवळण बंदी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवरही १४ एप्रिलपर्यंत बंदी घातली आहे. यापूर्वी ही बंदी ३१ मार्चपर्यंत घालण्यात आली होती. त्यात आता वाढ करण्यात आली आहे. केवळ मालवाहू विमानांचे उड्डाण चालू ठेवले जाणार आहे.

कोरोना आणि पाळीव प्राण्यांची समस्या !

सध्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगभर धुमाकूळ घातला आहे. नागरिक एकीकडे काळजी घेत आहेत, तर दुसरीकडे लोकांमधील स्वार्थी वृत्ती, निष्काळजीपणा दिसून येत आहे. असाच प्रकार आता सातारा शहरात पहायला मिळत आहे.

नाशिकमध्ये विनाकारण रस्त्यावर आणि चौकात गर्दी करण्यार्‍यांवर पोलिसांची ड्रोन कॅमेर्‍याच्या साहाय्याने टेहळणी

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात संचारबंदीचे आदेश लागू असतांनाही येथील जुने नाशिक, वडळा, फुलेनगर झोपडपट्टी परिसर अशा अनेक ठिकाणी नागरिक घराबाहेर पडून विनाकारण रस्त्यावर आणि चौकात गर्दी करत आहेत.

शेकडो कि.मी. अंतर चालत घरी जाणार्‍या मजुरांना साहाय्य करा ! – केंद्रशासनाचे राज्यशासनांना निर्देश

देशात दळणवळण बंदी झाल्यानंतर देशातील अनेक भागांमध्ये रोजंदारीवर काम करणारे मजूर शेकडो कि.मी. अंतर चालत जात त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे….

विविध घटकांसाठी १ लाख ७० सहस्र कोटी रुपयांचे ‘पॅकेज’ घोषित

कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात दळणवळण बंदी करण्यात आली आहे. या बंदीचा गरीबांना फटका बसू नये, यासाठी केंद्र सरकारकडून ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने’च्या अंतर्गत १ लाख ७० सहस्र कोटी रुपयांच्या ‘पॅकेज’ देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी केली.