कर्नाटकातील काँग्रेसचे प्रवक्ते एम्. लक्ष्मण यांचे देश आणि हिंदु द्रोही विधान !
मैसुरू (कर्नाटक) – पहलगाममध्ये मुसलमानांनी अनेक लोकांचे प्राण वाचवले. तिथे धर्म विचारून कुणालाही मारले नाही. उगाचच मुसलमान, मुसलमान; म्हणून भाजप अपप्रचार करत आहे, असे विधान काँग्रेसचे प्रवक्ते एम्. लक्ष्मण यांनी येथे केले.

Religion didn’t matter in Pahalgam killings, says M. Lakshman — Karnataka Congress’s anti-national, anti-Hindu face exposed!
Gov must file sedition charges NOW! Arrest him! Jail him for life via fast track court! ⚖️
Enough sympathy for jihadis and Hindu-haters!
Time to crush… pic.twitter.com/6GX7k9dSGt
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 27, 2025
लक्ष्मण पुढे म्हणाले की,
१. देशातील लोकांचे रक्त सांडून सत्ता मिळवणे, ही भाजपची सवय आहे. घटना घडली त्या दिवशी तिथे सैन्य आणि पोलीस का नव्हते ? यामागे काहीतरी वेगळा हेतू आहे. याची आंतरराष्ट्रीय संस्थेकडून चौकशी व्हायला हवी. (याच काँग्रेसने सत्तेत असतांना मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ च्या आतंकवादी आक्रमणाचा कट रचला आणि ते हिंदु आतंकवादी आक्रमण आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न केला; मात्र कसाब पोलिसांना जिवंत सापडला आणि काँग्रेसचा डाव फसला, असा जो दावा केला जात आहे, याचे अन्वेषण करून त्याची माहिती केंद्रातील भाजप सरकारने देशातील जनतेसमोर मांडणे आता आवश्यक आहे ! – संपादक)
२. हिंदु आणि मुसलमान यांच्यामध्ये फूट पाडून निवडणूक जिंकणे, हाच भाजपचा उद्देश आहे. ‘सर्व मुसलमान आतंकवादी आहेत’, असे दाखवण्याचे काम चालू झाले आहे, असा आरोप त्यांनी केला. (सर्व मुसलमान आतंकवादी आहेत, असे कधीच कुणी म्हणत नाही; मात्र जे आतंकवादी मुसलमान आहेत, त्यांना काँग्रेस कधीच मुसलमान आतंकवादी का म्हणत नाही ?, याचे उत्तर लक्ष्मण यांनी दिले पाहिजे ! – संपादक)
(म्हणे) ‘४ झाडांवर गोळीबार करून भाजपने ‘सर्जिकल स्ट्राईक’ म्हणून दाखवले !’
‘४ झाडांवर गोळीबार करून भाजपने त्याला‘ सर्जिकल स्ट्राईक’ म्हणून दाखवले. अशा प्रकारे लोकांना मूर्ख बनवणे, हेच भाजपचे काम आहे’, असा आरोपही लक्ष्मण यांनी केला. (हा आरोप लक्ष्मण यांनी सिद्ध करावा, अन्यथा केंद्र सरकारने त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा ! – संपादक)
संपादकीय भूमिकाएम्. लक्ष्मण यांच्या विरोधात तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी आणि त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून आजन्म कारागृहात रहाण्याची शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावा, तरच जिहादी आतंकवादप्रेमी आणि हिंदुद्रोही काँग्रेसवाल्यांचे डोके ठिकाणावर येईल ! |