
नवी देहली – देशात दळणवळण बंदी झाल्यानंतर देशातील अनेक भागांमध्ये रोजंदारीवर काम करणारे मजूर शेकडो कि.मी. अंतर चालत जात त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्य शासन आणि केंद्रशासित प्रदेश यांना या मजुरांना साहाय्य करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या रहाण्याची आणि जेवणाची सोय करण्यास शासनाने सांगितले आहे.
गुजरात, देहली आदी राज्यांतून शेकडे कि.मी. अंतर पायी पार करण्याचा प्रयत्न हे मजूर करत आहेत. अनेक जण साहित्य आणि मुले यांना खांद्यावर घेऊन प्रवास करत असल्याचे दिसत आहेत. पायी जाणार्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे. चालल्यामुळे त्यांना शारीरिक कष्ट होत असल्याचेही निदर्शनास येत आहे. ‘काम बंद झाल्याने, रहाण्याची, खाण्याची कोणतीही सोय नसल्याने, पुरेसे पैसेही नसल्याने आणि गाड्याही बंद झाल्याने घरी चालत जाण्यावाचून आम्हाला पर्याय नाही’, असे या मजुरांचे म्हणणे आहे.
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !
Nagar Nigam Varanasi Decision : वाराणसीमध्ये आता मांस आणि मासे मिळणार नाहीत !
Odisha Vigilance Arrests Engineer : ओडिशात अभियंत्याकडून कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त
रत्नागिरीत आयोगाचे कामकाज तातडीने पर्यायी जागेतून चालू करावे ! – संजय वैशंपायन