गुरांची अवैध वाहतूक करणार्‍या आरोपींवर कठोर कारवाई करा !

अवैध गुरांची वाहतूक अल्ताफ नामक चालक कत्तलीच्या हेतूने करत होता.असे निवेदन पोलिसांना का द्यावे लागते ? पोलीस स्वत:हून आरोपींवर कठोर कारवाईसाठी प्रयत्न कधी करणार ?

‘साई रिसॉर्ट’ न पाडण्याचा दिवाणी न्यायालयाचा तात्पुरता आदेश सत्र न्यायालयाकडून रहित !

रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केली होती पण आता साई रिसॉर्ट पाडण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.

समान नागरी कायदा आणि समान शिक्षण कायदा करा ! – ह.भ.प. भगवान महाराज कोकरे 

जाती आधारित असलेले आरक्षण रहित करून आर्थिक निकषांवर आणि गुणवत्तेवर आरक्षण देण्यात यावे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये होणार्‍या सर्व कार्यक्रमांना आता पूर्वअनुमती बंधनकारक !

विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली धक्काबुक्की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना मारहाण अशा घटनांमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये गेल्या ३ दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

माण आणि खटाव तालुके १५ दिवसांत दुष्काळी घोषित करा ! – डॉ. दिलीप येळगावकर, भाजपचे माजी आमदार

राज्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील माण आणि खटाव या तालुक्यांचा समावेश झालेला नाही. यामागे पर्जन्य अनुशेषाची माहिती योग्य पद्धतीने महसूल यंत्रणेकडून गोळा केली जात नाही, हेच मुख्य कारण आहे.

मुनावळे (जिल्हा सातारा) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ उभारणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

जिल्ह्यातील जावली तालुक्यातील मुनावळे येथे अत्याधुनिक आणि सर्व सोयींनी युक्त असे आंतरराष्ट्रीय प्रतीचे पर्यटन स्थळ विकसित करण्यात येत आहे. या माध्यमातून १०५ गावांतील स्थानिकांना रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होणार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

छत्रपती संभाजीनगर येथील बागेश्वर धामच्या दरबारात २ लाख लोकांच्या भोजनाची व्यवस्था !

छत्रपती संभाजीनगर शहरात बागेश्वर धाम येथील धीरेंद्र  शास्त्री महाराज यांच्या सोहळ्याच्या निमित्ताने चैतन्य आणि संपूर्ण उत्साहाचे वातावरण पसरले आहे. संपूर्ण शहरभर फलक लागले आहेत. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री हे ३  दिवसांच्या श्रीराम कथेच्या निमित्ताने प्रथमच शहरात आले आहेत.

सरकारने मराठा समाजाशी चर्चा करून आरक्षण द्यावे ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे; कारण जेव्हा देश गुलामगिरीत होता, तेव्हा शौर्याने स्वातंत्र्य मिळवून देण्याचे काम मराठा समाजाने केले आहे. सरकारने मराठा समाजाशी चर्चा करून त्यांना आरक्षण दिले पाहिजे.

शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे नवे अध्यक्ष

मुंबई येथील प्रसिद्ध देवस्थान सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर हे या न्यासाचे अध्यक्ष होते.

कॅनडाच्या संसदेत आयोजित दिवाळी समारंभाच्या वेळी ॐ लिहिलेला भगवा ध्वज फडकावला !

कॅनडातील भारतीय वंशाचे हिंदु खासदार चंद्रशेखर आर्य यांनी येथील ‘पार्लियामेंट हिल’वर दिवाळीनिमित्त एका भव्य समारंभाचे आयोजन केले होते. संसदेत समारोह पार पडला, तर संसदेच्या बाहेर हिंदूंचे पवित्र चिन्ह असलेला ॐ लिहिलेला भगवा ध्वज फडकावण्यात आला, अशी माहिती स्वत: आर्य यांनी दिली.