सरकारने मराठा समाजाशी चर्चा करून आरक्षण द्यावे ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे मत !

छत्रपती संभाजीनगर – मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे; कारण जेव्हा देश गुलामगिरीत होता, तेव्हा शौर्याने स्वातंत्र्य मिळवून देण्याचे काम मराठा समाजाने केले आहे. सरकारने मराठा समाजाशी चर्चा करून त्यांना आरक्षण दिले पाहिजे. बागेश्‍वर पीठ मराठा समाजासमवेत आहे, असे विधान बागेश्‍वर धामचे आध्यात्मिक गुरु पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी केले. छत्रपती संभाजीनगरमध्ये पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचा ८ नोव्हेंबरपर्यंत दरबार असणार आहे. त्यानिमित्ताने त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना वरील विधान केले.