हक्काच्या घरासाठी छोटा रूद्र आणि त्याच्या नातेवाइकांचे उपोषण

तिवरे येथे अतीवृष्टीमुळे धरण फुटले होते. या दुर्घटने रूद्र चव्हाण याचे वडील रणजित, आई ऋतुजा, तसेच बहीण दुर्वा यांचा मृत्यू झाला होता. या वेळी रूद्र त्याच्या आत्याकडे वास्तव्यास असल्यामुळे वाचला होता.

बंगालमध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी !

तृणमूल काँग्रेस सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात देशभरातील धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी हिंदूंनी आवाज उठवणे आवश्यक आहे. हा हिंदूंवरील अत्याचारला दडपण्याचाच हुकूमशाही प्रकार आहे.

पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत अध्यक्षपदी रहाणार ! – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

सुप्रिया सुळे यांच्यावर अध्यक्षपदाची धुरा सोपवण्याचा विचार आताच करता येणार नाही. पक्ष आणि कार्यकर्ते यांच्यासाठी मी निवृत्ती मागे घेतली. पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत मीच अध्यक्षपदी रहाणार आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

पाक १९९ भारतीय मासेमारांची सुटका करण्याच्या सिद्धतेत !

सद्भावनेच्या दृष्टीकोनातून पाक सरकार १९९ भारतीय मसेमारांची १२ मे या दिवशी सुटका करण्याच्या सिद्धतेत असल्याचे वृत्त आहे. सध्या हे सर्व आरोपी कराची येथील कारागृहात आहेत.

गोव्यात श्रीराम सेनेला विरोध करणारा भाजप हनुमान चालिसाचे पठण करतो ! – कर्नाटकातील काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार

गोव्यामध्ये भाजपचे सरकार असूनही तेथे श्रीराम सेनेला प्रवेश नाही. श्रीराम सेनेला तेथे कार्य करता येत नाही; मात्र तेच भाजपवाले कर्नाटकात हनुमान चालिसा पठण करत आहेत, अशी टीका कर्नाटकातील काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांनी केली.

‘द केरल स्टोरी’ला विरोध करणे चुकीचे ! – अभिनेत्री शबाना आझमी

नुकताच प्रदर्शित झालेला ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाला विरोध करणे चुकीचे आहे, असे मत अभिनेत्री शबाना आझमी यांनी ट्वीट करून व्यक्त केले.

लडाखमध्ये बसवण्यात आले जगातील पहिले ‘लाय फाय’ नेटवर्क !

लडाख येथील डोंगराळ क्षेत्रात संपर्कासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. ‘लाय फाय’ असे याचे नाव आहे. याची यशस्वी चाचणी करण्यात आली. ‘लाय फाय’, म्हणजेच ‘लाईफ फिडॅलिटी टेक्नोलॉजी’ असे याचे नाव आहे.

छत्तीसगडमध्ये २ सहस्र कोटी रुपयांचा मद्य घोटाळा उघड : काँग्रेसच्या नेत्याचा भाऊ अन्वर ढेबर याला अटक

एवढे होईपर्यंत छत्तीसगडमधील काँग्रेस सरकार झोपा काढत होते का ? कि त्यांनी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले ?, हे जनतेला कळले पाहिजे !

गुजरातमध्ये वर्ष २०१६ ते २०२० या ५ वर्षांत ४१ सहस्रांहून अधिक महिला बेपत्ता !

देशभर मुली आणि महिला यांचे बेपत्ता होण्याचे वाढते प्रमाण पहाता, हे आता ‘राष्ट्रीय संकट’ घोषित करून ते  रोखण्यासाठी केंद्र अन् राज्य सरकारे यांनी युद्धपातळीवर पावले उचलणे आवश्यक आहे !

पी.एफ्.आय.च्या ५५ समर्थकांना अटक !

उत्तरप्रदेशात ३० जिल्ह्यांमध्ये आतंकवादविरोधी पथकाकडून धाडी
समाजवादी पक्षाचा नेता अब्दुल खालिक याला अटक