देश आणि जग यांना उपयुक्त ठरेल, असा पंचमहाभूत लोकोत्सव ! – नारायण राणे, केंद्रीय मंत्री, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खाते

पंचमहाभूत लोकोत्सवा’चा समारोप ! 30 लाख लोकांच्या भेटीने पुरोगामी आणि साम्यवादी यांना चपराक ! कोल्हापूर, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – प.पू. काडसिद्धेश्वर स्वामी समाजहित, देशहित यांचे कार्य करत आहेत. या महोत्सवात ३० लाखांपेक्षा अधिक लोक येऊन गेले. या कार्यातून समाजात मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे. या लोकोत्सवाच्या माध्यमातून शिकून घेऊन त्याचा उपयोग मी राज्य आणि देश … Read more

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून हिंदु व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या !  

३३ वर्षांनंतरही काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षित असणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

भारताला चीनकडून व्यावसायिक क्षेत्रातील प्रामाणिकपणा शिकायला हवा ! – उद्योगपती नारायण मूर्ती

भारताला चीनकडून व्यावसायिक क्षेत्रातील प्रामाणिकपणा  शिकण्याची आवश्यकता आहे. वर्ष १९४० पर्यंत भारत आणि चीन यांच्या अर्थव्यवस्थेचा आकार जवळपास समान होता; पण त्यानंतर चीनचा विकास झपाट्याने झाला आणि आज त्यांची अर्थव्यवस्था भारताच्या ६ पट आहे.

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या आक्रमणात एका सैनिकाचा मृत्यू !

काँग्रेस सरकारची सत्ता असलेल्या छत्तीसगड येथे कायदा आणि सुव्यवस्था यांचे तीनतेरा ! जिथे सैनिक आणि पोलीस यांच्या सुरक्षिततेची ही स्थिती आहे, तिथे सर्वसाधारण जनतेची काय कथा !

नेपाळमध्ये उपपंतप्रधानांसह ४ मंत्र्यांचे त्यागपत्र

नेपाळच्या पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या सरकारमधील उपपंतप्रधान राजेंद्र सिंह लिंगडेन यांच्यासह राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाच्या (आर्.पी.पी.) ४ मंत्र्यांनी त्यागपत्र दिले आहे.

बलुचिस्तानमधील बाँबस्फोटात ४ जण ठार

पाकिस्तानाने बळकावलेल्या बलुचिस्तानमध्ये झालेल्या बाँबस्फोटात ४ जण ठार, तर १० जण घायाळ झाले. हा बाँबस्फोट बरखान शहरातील रखनी मंडईमध्ये झाला.

आत्महत्या करणारे बहुसंख्य विद्यार्थी दलित आणि आदिवासी ! – सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा दावा

समाजातील एखाद्या उपेक्षित घटकाविषयी सहानुभूती नसल्यामुळे जो भेदभाव वाढला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. प्राध्यापक सुखदेव थोरात यांनी नमूद केलेले आहे, ‘आत्महत्येमुळे मरण पावलेले बहुसंख्य विद्यार्थी दलित आणि आदिवासी होते’, असा दावा भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले.

राष्ट्राध्यक्ष बनल्यास शत्रूराष्ट्रांना देण्यात येणारे साहाय्य बंद करू ! – निक्की हेली

मी राष्ट्राध्यक्ष बनल्यास अमेरिकेच्या शत्रूंना करण्यात येणारे आर्थिक साहाय्य पूर्णपणे थांबवेन, अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी स्वतःच्या नावाची घोषणा करणार्‍या भारतीय वंशाच्या नेत्या निक्की हेली यांनी केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील ३ नदीपट्टे प्रदूषित !

देशभरातील ३११ नदीपट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून यात महाराष्ट्रातील ५५ नदीपट्ट्यांचा समावेश आहे. यात रत्नागिरीतील ३ नदीपट्टे प्रदूषित असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून पुढे आले आहे.

हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त अंबड (जिल्हा जालना) येथे वाहन फेरी !

‘कौन चले रे कौन चले’, ‘हिंदु राष्ट्र के वीर चले’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’ अशा घोषणांनी शहर दणाणून गेले. फेरीच्या मार्गाने अनेक चौकांत धर्मध्वजाचे पूजन आणि पुष्पवृष्टी करण्यात आली.