जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांची हुशारी पडताळण्यासाठी विद्यार्थ्यांसमवेत ६० सहस्र शिक्षकांची परीक्षा घेण्यात येणार !

जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्ता न पहाताच शिक्षकांची भरती केली जाण्याचा आरोप केला जातो. त्यामुळे शाळेत गुणवत्ता असलेल्या शिक्षकांची भरती अल्प होते. याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आणि शिक्षणाचा दर्जा खालावतो.

तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील बसस्थानकाची दुरवस्था !

श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी राज्यभरातून सहस्रो भाविक येथे येत असतात; मात्र येथील प्रवासी सुविधेकडे दुर्लक्ष होत आहे. बसस्थानकाच्या इमारतीचे छत नादुरुस्त झाल्याने ते कोसळण्याच्या स्थितीत आहे. 

व्हॉट्सॲपवर ६ डिसेंबरला ‘शौर्य दिवस स्टेट्स’ ठेवल्याने हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना धर्मांधांची धमकी !

पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले होते. तरीही धर्मांधांनी हातात शस्त्रे घेऊन परिसरात हिंडल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. ओंकार घोलप यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल, असे संभाषण करणार्‍या धर्मांधाच्या विरोधात तक्रार दिली आहे.

विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास प्रारंभ !

७ डिसेंबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय येथे विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रमाणे ८ डिसेंबरला तात्काळ मोहीम राबवत प्रशासनाने विशाळगडाच्या पायथ्याला असलेली आणि जुन्या फरसबंदी मार्गावरील अतिक्रमणे काढण्यास प्रारंभ केला आहे.

हिंदूंमध्ये अभिनव पद्धतीने जनजागृती करणारे जखीणवाडी (जिल्हा सातारा) येथील धर्मप्रेमी श्री. शुभम पाटील !

लहानपणापासूनच धर्मकार्य करण्याची विशेष आवड असणारे धर्मप्रेमी युवक श्री. शुभम पाटील हे विविध माध्यमांतून हिंदु युवकांचे संघटन आणि प्रबोधन करत आहेत. ते गेल्या काही वर्षांपासून हिंदु जनजागृती समितीच्या कार्याशी जोडले आहेत.

मुलुंड (मुंबई) येथील कोकण महोत्सवात सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंसह विविध मान्यवरांची भेट !

मुलुंड (पूर्व) येथील तालुका क्रीडासंकुल येथे मुलुंड सेवा संघ महिला बचतगट आणि भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.

धार्मिक स्थळे आणि तालमी यांच्यावरील मिळकत कर माफ करण्याची मागणी !

शहरातील धार्मिक स्थळे आणि तालमी यांच्यावरील मिळकत कर माफ करावा, अशी मागणी शहरातील धार्मिक स्थळांमधील कार्यकर्त्यांनी महापालिकेकडे निवेदन देऊन केली.

मुंबई महापालिकेच्या अभियंत्यावर गुन्हा नोंद !

भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र ! सरकारी अधिकारीच भ्रष्ट असतील, तर राज्य कधीतरी भ्रष्टाचारमुक्त होईल का ? अशा अधिकार्‍यांना कठोर शिक्षा करायला हवी !

गुजरातमध्ये हिंदुत्वाची सुनामी !

गुजरातच्या निवडणुकीमुळे प्रखर राष्ट्रवादाची भूमिका घेत हिंदुत्वाच्या सूत्रावर तितकेच आग्रही रहाणे, विकासाच्या सूत्रावर तडजोड न करणे, निवडणुकीत लोकांना दिलेली आश्वासने पाळणे या गोष्टींवर जर भर दिला, तर नागरिक भरभरून मते देतात, हेच परत एकदा या निमित्ताने सिद्ध झाले आहे.

१५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचार्‍याला पकडले !

भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र ! पोलीसच लाच घेत असतील, तर राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे राज्य कसे येणार ?