नंदुरबार येथे अवैध धंद्यांचा सुळसुळाट !

महाराष्ट्रात गुटखाबंदी असल्याने गुजरातमधून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुटखा तस्करी होते.

महाराष्ट्रातील ७५ लाख नागरिकांकडून लसीचा दुसरा डोस घेण्यास नकार !

आरोग्यदृष्ट्या निर्माण झालेल्या आपत्कालीन स्थितीतही लसीकरण पूर्ण न करणारे असंवेदनशील नागरिक ! स्वतःच्या आरोग्याविषयी हलगर्जीपणा करणारे नागरिक राष्ट्राचा विचार कधीतरी करू शकतील का ?

पणजी बनत आहे जुगाराची राजधानी ! – शैलेंद्र वेलिंगकर, परशुराम सेना

गोव्याची राजधानी पणजी आता जुगाराची राजधानी होऊ लागली आहे. तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई न केल्याने आम्ही दिवसाढवळ्या कॅसिनोत जाऊन हा प्रकार उघडकीस आणला, असे परशुराम सेनेचे श्री. शैलेंद्र वेलिंगकर यांनी सांगितले.

निवडणूक आचारसंहितेपूर्वी राज्यात रथयात्रा काढणार ! – सुदिन ढवळीकर, आमदार, मगोप

सध्या भाजपला मगोपशी युती हवी आहे; मात्र मगो पक्षाने कडक धोरण अवलंबले आहे. पक्षाचे नेते श्री. सुदिन ढवळीकर यांनी भाजप वगळता अन्य कोणत्याही पक्षाशी युती करण्याचा निर्णय १५ डिसेंबरनंतर कधीही होऊ शकतो, असे निवेदन केले आहे.

जलयुक्तशिवार योजना बंद केल्याने राज्यातील गाळमुक्त धरण योजनेची कामे ठप्प !

राज्यातील जलयुक्तशिवार योजना ३१ मार्च २०२० पासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेच्या अंतर्गत करण्यात येणार्‍या गाळमुक्त धरण योजनेचे एकही काम राज्यात झालेले नाही.

अमरावती येथे हिंदु जनजागृती समितीच्या प्रसारकार्याला हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांचे संपर्क अभियान !

निवडणूक आयोग सक्रीय कधी होणार ?

स्वायत्त अधिकार असलेल्या निवडणूक आयोगाने एकदा स्वत:ची भूमिका निश्चित करावी ? वाघ होऊन डरकाळी फोडावी कि वाघाची मावशी होऊन दुर्लक्ष करावे, हे त्यांच्याच हातात आहे.

अणाव, हुमरमळा येथे घरावर वीज पडून ८० सहस्र रुपयांची हानी

सुदैवाने जीवितहानी झाली नाही. कुडाळ पंचायत समितीचे उपसभापती, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख, पोलीस पाटीलआदींनी दळवी यांची भेट घेऊन दळवी कुटुंबियांना धीर दिला.

मये ग्रामस्थांच्या वतीने दीपावलीच्या पूर्वसंध्येला भगवान श्रीकृष्ण विजयोत्सव फेरीचे आयोजन

मये ग्रामस्थांच्या वतीने दीपावलीच्या पूर्वसंध्येला ३ नोव्हेंबरच्या रात्री ९ वाजता भगवान श्रीकृष्ण विजयोत्सव फेरीचे आयोजन करण्यात आले. या फेरीला गावकरवाडा येथील श्री महामाया प्रांगणातून सामूहिक प्रार्थना केल्यानंतर प्रारंभ झाला.

मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्‍वर आणि श्री देव नारायण यांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा !

यावर्षी पालखी सोहळा चालू झाल्यावर वरूणराजाचेही आगमन झाले. तरीही देवाचे रूप डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी भरपावसातही सहस्रो भाविकांचा सहभाग होता !