कन्याकुमारी (तमिळनाडू) जिल्ह्यातील अनधिकृत चर्चच्या विरोधात आंदोलन करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना अटक !

काही घंट्यांनी सुटका !
जिल्ह्यातील ३०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांकडून ५० ठिकाणी ‘रस्ताबंद’ आंदोलन !

पुडुकोट्टई (तमिळनाडू) येथे अज्ञातांकडून प्राचीन शिवलिंग आणि भगवान शिवाच्या मूर्तीची तोडफोड

राज्यात द्रमुकचे सरकार आल्यापासून हिंदु धर्मावरील आघातांमध्ये वाढ !

१२ वीचा निकाल ३१ जुलैपर्यंत घोषित करा ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

तसेच येत्या १० दिवसांत अंतर्गत मूल्यांकन योजना सिद्ध करावी, असा आदेशही देण्यात आला आहे.

इंडोनेशियामध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती लपवून ठेवणार्‍या इस्लामी धर्मगुरूला ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

‘शिहाब यांनी माहिती लपवल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्यात अडचणी निर्माण झाल्या, तसेच त्यांनी लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण केला’, असे न्यायालयाने शिक्षा ठोठावतांना म्हटले.

धर्मांतराच्या विरोधात फाशीसारखी कठोर शिक्षाही करणारे देश !

भारतात धर्मांतरविरोधी कायदे नसल्याने सहस्रोंच्या संख्येने हिंदूंचे धर्मांतर होत आले आहे आणि होत आहे. जर धर्मांतरबंदीचा कायदा करण्यात आला नाही, तर पुढेही धर्मांतर होत राहील आणि एके दिवशी हिंदू अल्पसंख्यांक होतील.

नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करत स्थानिकांचा सिडकोच्या कार्यालयाला घेराव !

नवी मुंबई येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्थानिक लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक भूमीपुत्र यांनी २४ जून या दिवशी येथील सिडकोच्या कार्यालयाला घेराव घातला.

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांच्या दहशतीमुळे हिंदु परिवार पलायन करण्याच्या सिद्धतेत !

उत्तरप्रदेशमध्ये ही स्थिती असेल, तर देशातील ८ राज्यांत अल्पसंख्यांक असणार्‍या राज्यांची हिंदूंची स्थिती काय असेल, याची कल्पना करता येत नाही !

पत्नी आणि मुलगा यांच्या इस्लाममध्ये धर्मांतरित होण्याचा विरोध केल्यावर ख्रिस्ती कार्यकर्त्याला पक्षातून काढले !

केरळमधील सत्ताधारी माकपचे धर्मांधांप्रतीचे प्रेम !
पत्नी आणि मुलगा यांच्या बलपूर्वक धर्मांतरास विरोध करण्यासाठी पक्षाकडून मागितले होते साहाय्य !

‘दलितांना सन्मान द्यायला अल्प ठरल्याने ते धर्मांतर करून ख्रिस्ती होतात !’ – तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव

दलितांना सन्मान न दिल्याने ते ख्रिस्ती होत नसून खिस्ती मिशनरी त्यांना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करतात आणि नंतर वार्‍यावर सोडतात, ही वस्तूस्थिती आहे.

जगभरातील १३८ देशांनी गेल्या ६ वर्षांत अवैधरित्या रहाणार्‍या ८ लाखांहून अधिक पाकिस्तानी नागरिकांना हाकलले !

अवैधरित्या प्रवेश करणे, कागदपत्रांमध्ये पालट करणे, काम करण्याचा व्हिसा संपल्यानंतरही परत न जाणे आदी कारणांमुळे जगभरातील १३८ देशांमधून पाकिस्तानी नागरिकांना हाकलण्यात आल्याच्या घटना वर्ष २०१५ पासून मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत.