५०० गाड्यांचे शक्‍तीप्रदर्शन करत तेलंगाणाचे मुख्‍यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे सोलापुरात आगमन !

देवाला भक्‍तीभाव हवा असतो आणि वारकरी हा अत्‍यंत लीन असतो. त्‍यामुळे पंढरपूरच्‍या विठ्ठलाच्‍या दर्शनासाठी येतांना हा बडेजाव आणि शक्‍तीप्रदर्शन कशासाठी ? असा प्रश्‍न सामान्‍य नागरिकांच्‍या मनात उपस्‍थित होत आहे !

तेलंगाणा सरकारकडून रमझानच्या काळात मुसलमान कर्मचार्‍यांना १ घंटा आधी घरी जाण्याची अनुमती

यापूर्वी बिहार सरकारनेही असा निर्णय घेतला आहे. तेथे एक घंटा आधी कामावर उपस्थित रहाण्यास सांगण्यात आले आहे.

तेलंगाणातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्या के. कविता यांची चौकशी !

देहली येथील अबकारी धोरण, म्हणजेच मद्य घोटाळ्याच्या प्रकरणात ही चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी त्यांना अटक होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

‘भारत राष्‍ट्र समिती’ या पक्षाच्‍या फलकावरील भारताच्‍या मानचित्रात (नकाशात) जम्‍मू-काश्‍मीरचा भाग वगळला !

तेलंगाणातील निझामाबादचे भाजपचे खासदार अरविंद धर्मपुरी यांनी ‘तेलंगाणाचे मुख्‍यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा नवा राष्‍ट्रीय पक्ष ‘भारत राष्‍ट्र समिती’च्‍या फलकावरील भारताच्‍या मानचित्रात (नकाशात) काश्‍मीरचा भाग वगळण्‍यात आल्‍याचे दाखवण्‍यात आले आहे’, असा आरोप केला आहे.

‘तेलंगाणा राष्ट्र समिती’चे नाव आता ‘भारत राष्ट्र समिती’ !  

आता राज्यात पक्षाने केलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती संपूर्ण देशभरात सांगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या बैठकीला तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव अनुपस्थित रहाण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ ऑगस्ट २०२२ या दिवशी नवी देहली येथे आयोजित केलेल्या ‘आझादी का अमृत महोत्सव’च्या राष्ट्रीय समितीच्या बैठकीला तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव अनुपस्थित रहाण्याची शक्यता आहे.

आधुनिक रझाकार !

तेलंगाणातील हिंदूंना स्वाभिमानाने जगायचे असल्यास त्यांना आधुनिक रझाकारांच्या विरोधात वैध मार्गाने लढा देण्यासाठी उभे रहावेच लागेल. यासाठी तेथील हिंदू सिद्ध आहेत का ? बोधन प्रकरणातून तेलंगाणामधील सत्ताधारी पक्ष, प्रशासन आणि पोलीस हिंदूंच्या साहाय्यासाठी धावून येणार नाहीत, हे सिद्ध झाले आहे. हे लक्षात घेऊन परिणामकारक संघटन, हाच हिंदूंच्या प्रत्येक समस्येवरील उपाय आहे, हे जाणा !

(म्हणे) ‘भगवा ध्वज बंगालच्या खाडीत बुडवायला हवा !’

के. चंद्रशेखर राव यांचा तेलंगाणा राष्ट्र समिती हा पक्ष मुसलमानांचे लांगूलचालन करण्यात धन्यता मानतो आणि हिंदूंना नेहमीच दुय्यम स्थान देतो. अशांना भगवा ध्वज खुपल्यास आश्‍चर्य ते काय ?

भारताची राज्यघटना नव्याने लिहिण्याची आवश्यकता ! – तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव

भारताची राज्यघटना नव्याने लिहिण्याची आवश्यकता आहे. देशातील सर्व नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार असून त्यांना ‘माझ्या समवेत लढणार का ?’, असे विचारणार आहे.