माझ्या वडिलांचा मृत्यू रुग्णालयातील कर्मचार्‍यांमुळे झाला ! – अभिनेत्री संभावना सेठ

अभिनेत्री संभावना सेठ यांनी त्यांच्या वडिलांचा मृत्यू रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांमुळे झाल्याचा आरोप करत येथील ‘जयपूर गोल्डन’ रुग्णालयाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ‘माझ्या वडिलांचा मृत्यू कोरोनामुळे नाही तर वैद्यकीय हत्येमुळे झाला आहे

नागपूर येथे बनावट नोटा छापणार्‍या दोघांना अटक !

गुन्हे शाखेने मानकापूर येथील एका खोलीत बनावट नोटा छापून त्या चलनात आणणारे नीलेश कडवे आणि मारुफ खान रफिक खान यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून संगणक, प्रिंटरसह १००, ५०, २०, आणि १० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक आणि कर्मचारी यांचे निलंबन !

जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील मारोड या गावातील प्राथमिक शाळेतील विलगीकरण कक्षात १५ कोरोनाबाधित रुग्ण असतांना तेथील स्वच्छतागृहाची स्वच्छता ८ वर्षाच्या एका मुलाकडून करून घेण्यात आली.

विशाळगडावरील अतिक्रमणे हटवून तेथे नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या पराक्रमाचे भव्य स्मारक उभारा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष परिसंवादांतर्गत ‘शिवप्रभूंच्या विशाळगडाचे इस्लामीकरण रोखा !’ या विषयावर ‘ऑनलाईन’चर्चासत्र ! 

कोरोनावर आयुर्वेदाचे औषध देणार असल्याचे सांगून फसवणूक करणार्‍या दोन धर्मांधांसह चौघांना अटक !

कोरोनावर आयुर्वेदाचे औषध देतो, असे सांगून लोकांचे कोट्यवधी रुपये ‘ऑनलाईन’द्वारे लुबाडणार्‍या दोन धर्मांधांसह चार जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. नागरिकांनो, अशा फसव्या लोकांच्या आमिषांना न भुलता वेळीच सावध व्हा !

मुंबईतील ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ यांच्या चाचणीचे मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन !

मुंबईतील ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ यांच्या चाचणीचे ३१ मे या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांदिवली येथील आकुर्ली रेल्वेस्थानकावर हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले. विरोधात आंदोलन करणार्‍या भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले कह्यात.

अकोला येथे गांजा तस्करीप्रकरणी आतंकवादविरोधी पथकाकडून २ धर्मांधांना अटक !

अमरावतीमधील हमजा प्लॉट येथून १ जून या दिवशी दुपारी चारचाकीतून विक्रीसाठी आलेला ४ लाख रुपयांचा गांजा आतंकवादविरोधी पथकाने जप्त केला आहे. समाजाला व्यसनाधीन करण्यात धर्मांधच नेहमी पुढे असतात, हेच यावरून उघड होते.

प्रतिकूल परिस्थितीत देवाची कृपाच आपणास तारून नेऊ शकते, नामस्मरणाने मनोबल वाढते ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘कोरोना महामारीच्या काळात मनाची स्थिती स्थिर कशी ठेवावी?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ सत्संग

आपले सत्ताधारी सतर्क नसल्यामुळे वर्ष २०२० पेक्षा वर्ष २०२१ भयंकर ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

जगावर आलेल्या या संकटाची कुणालाच कल्पना नव्हती. केवळ आपल्याकडून नव्हे, तर अमेरिका आणि युरोपिय देश यांच्याकडूनही चुका झाल्या; मात्र ते लवकर वठणीवर आले, आपण अद्यापही आलो नाही. ‘मागच्यास ठेच पुढचा शहाणा’, हे आपल्याकडे झाले नाही.

वर्धा येथील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नीलेश देशमुख यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक !

आर्वी ते कौंडण्यापूर रस्त्याचे काम करणार्‍या अमरावती येथील ‘शैलेश इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनाने केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.