मिरज शहरप्रमुख विशालसिंग राजपूत यांनी केली ५ सहस्र शिवसेना सदस्य नोंदणी !

शिवसेना मिरज शहरप्रमुख श्री. विशालसिंग राजपूत यांनी मिरज शहरात शिवसेना सभासद नोंदणी अभियान राबवले. यात ५ सहस्र सभासदांची नोंदणी करण्यात आली.

‘मेट्रो ३’च्या कारशेडसाठी अन्य पर्याय उपलब्ध होतो का ? हे पहात आहोत ! – एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री

रत्नागिरी जिल्हा ‘ॲग्रिकल्चर झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांना विचारले

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवा ! – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे, किल्ले आदी सार्वजनिक ठिकाणी होणारे अपप्रकार थांबवावेत, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले.

गेली ७२ वर्षे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणारे गाव ‘बेल्लद बागेवाडी’

बिनविरोध निवडणुकीमुळे गावाच्या विकासाला गती मिळणार आहे.

३१ डिसेंबर या दिवशी पुण्यात पुन्हा एल्गार परिषद घेण्याचा डाव

वर्ष २०१७ मधील एल्गार परिषदेनंतर दुसर्‍या दिवशी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाजवळ हिंसाचाराची घटना घडली होती. या हिंसाचाराला एल्गार परिषदेचीच पार्श्‍वभूमी कारणीभूत असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले होते. गेल्या वेळेचा अनुभव पहाता पोलीस या परिषदेला अनुमती देणार का . . . ?

कोरोनाची नियमावली डावलून एल्गार परिषदेला अनुमती देता येईल का ? याचा विचार करता येईल ! – नवाब मलिक, अल्पसंख्यांकमंत्री

अनुमती देण्यापूर्वी या परिषदेतील चिथावणीखोर वक्तव्यांमुळे कोरेगाव भीमा दंगल झाली होती, याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा, असे जनतेला वाटते !

वसई (जिल्हा पालघर) येथे ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून रस्त्यावर फेकणार्‍या नराधमाला अटक

मुंबई उपनगरातील वसई येथे एका वासनांधाने ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून ती मृत झाली आहे, असे समजून पिशवीत भरून रस्त्यावर फेकून दिले. पोलिसांनी या नराधमाला अटक केले असून त्याने गुन्ह्याची स्वीकृती दिली आहे.

(म्हणे) ‘ताडी गंगेच्या पाण्यापेक्षा शुद्ध असल्याने ती प्यायल्याने कोरोनाचा संसर्ग होत नाही !’ – बसपचे उत्तरप्रदेश प्रमुख भीम राजभर यांचा दावा

योगगुरु रामदेवबाबा यांच्या औषधाला त्यांच्या आस्थापनाने ‘कोरोनावरील औषध’ संबोधल्याने त्यावर बंदी घालणारे प्रशासन आता अशांवर काय कारवाई करणार आहे ?

‘ऑनलाईन’ २० व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे २५ डिसेंबरला उद्घाटन !

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या वतीने या वर्षी २५ आणि २६ डिसेंबर या दिवशी २० व्या संमेलनाचे आयोजन केलेले असून या संमेलनाचा उद्घाटन सोहळा २५ डिसेंबर या दिवशी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या क्षेत्राची केंद्रीय पथकाकडून पहाणी

केंद्र सरकारच्या अधिकार्‍यांच्या पथकाने येथे अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या क्षेत्राची २२ डिसेंबर या दिवशी पहाणी केली. या वेळी त्यांनी मोहोळ तालुक्यातील लांबोटी, कोळेगाव आणि पेनूर येथे झालेल्या हानीक्षेत्राची पहाणी केली.