
बेळगाव – येथील हुक्केरी तालुक्यातील ‘बेल्लद बागेवाडी’ या गावात वर्ष १९४८ ते १९७७ पर्यंत केवळ एका प्रभागातील निवडणूक वगळता गत ७२ वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून गावाने राज्यात ओळख निर्माण केली आहे. माजी मंत्री आणि सलग आठव्यांदा निवडून आलेले आमदार उमेश कत्ती, तसेच माजी खासदार अन् जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश कत्ती यांचे हे गाव आहे. यंदाच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व ३३ जागा बिनविरोध झाल्या आहेत. माजी खासदार रमेश कत्ती आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
| ‘बेल्लद बागेवाडी’ ग्रामपंचायतीने ७२ वर्षांपासून निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा राखली आहे. राज्यात हा आदर्श आहे. बिनविरोध निवडणुकीमुळे गावाच्या विकासाला गती मिळणार आहे. भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रयत्नांमुळे यंदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. – रमेश कत्ती, अध्यक्ष, जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक |
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान
गोव्यात कॅसिनोंमधील ‘गेमिंग’ क्षेत्रात २१ वर्षांखालील व्यक्तीला प्रवेश बंदी
हवामान खात्याचा नव्हे, तर पंचांगाचा अंदाज खरा ठरला ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा सुनील कच्छवे यांनी पदभार स्वीकारला !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय