
बेळगाव – येथील हुक्केरी तालुक्यातील ‘बेल्लद बागेवाडी’ या गावात वर्ष १९४८ ते १९७७ पर्यंत केवळ एका प्रभागातील निवडणूक वगळता गत ७२ वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून गावाने राज्यात ओळख निर्माण केली आहे. माजी मंत्री आणि सलग आठव्यांदा निवडून आलेले आमदार उमेश कत्ती, तसेच माजी खासदार अन् जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश कत्ती यांचे हे गाव आहे. यंदाच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व ३३ जागा बिनविरोध झाल्या आहेत. माजी खासदार रमेश कत्ती आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
| ‘बेल्लद बागेवाडी’ ग्रामपंचायतीने ७२ वर्षांपासून निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा राखली आहे. राज्यात हा आदर्श आहे. बिनविरोध निवडणुकीमुळे गावाच्या विकासाला गती मिळणार आहे. भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रयत्नांमुळे यंदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. – रमेश कत्ती, अध्यक्ष, जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक |
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
अडचणी असल्या, तरी जलजीवन मिशन योजना पूर्ण करावीच लागेल !
अनधिकृत डोंगर कापणी केल्यास १ कोटी रुपयांपर्यंत दंड
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीविरुद्ध प्राधान्याने कारवाई करणार !
Brihanmumbai Municipal Corporation : विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !