आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचालनालयाची (इडीची) धाड !

मुंबई आणि ठाणे परिसरातील एकूण १० ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाकडून अन्वेषण (‘सर्च ऑपरेशन’) करण्यात येत असल्याचे समजते.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्‍या तरुणाचे पैशाच्या वादावरून अपहरण !

एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून रिक्शातून त्याला शहरात फिरवले जाते. तरीसुद्धा पोलिसांना थांगपत्ता लागत नाही, यावरून शहरात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे का, अशी शंका सामान्य नागरिकांना आल्यास चूक ते काय ? – संपादक

गेल्या ६ वर्षांत एकातरी भाजप नेत्याच्या घरावर इडीने धाड टाकली का ? – सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस

आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचं ते कार्ट.., भाजपवाल्यांकडे कोट्यवधींची संपत्ती आहे मग त्यांची चौकशी का नाही ?, असे प्रश्‍न काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केले आहेत.

संबंधित दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांना अटक करा !

पंढरपूर येथील कुंभार घाट दुर्घटना प्रकरणी महादेव कोळी समाजाचे आंदोलन

सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था, कायदा हा सत्ताधार्‍यांचा गुलाम, चाकर आणि नोकर असल्यासारखे वागत असतील, तर आम्ही पर्वा करत नाही.

कोरोनाची दुसरी लाट आल्यास प्रशासन सज्ज ! – कोल्हापूर जिल्हाधिकारी

सध्या कोरोनावरील लस उपलब्ध नसल्याने काळजी हीच त्यावरील लस आहे. प्रशासन वारंवार कोरोनाच्या संदर्भातील आचारसंहितेचे पालन करा, असे सांगत आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यास त्याचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सिद्ध आहे.

पुण्यातील ससून रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि सुरक्षारक्षक यांना विद्यार्थ्यांची धक्काबुक्की अन् मारहाण

असे विद्यार्थी देशाचे भवितव्य काय घडवणार ?

सरसकट दळणवळण बंदीचा निर्णय हा पूर्वपदावर येत असलेल्या अर्थचक्राला खीळ घालणारा ठरेल ! – पुणे व्यापारी महासंघ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढील ८ ते १० दिवसांत परिस्थिती पाहून दळणवळण बंदीचा निर्णय घेतला जाईल, असे सूतोवाच केले आहे.

पुण्यात महिला पोलीस कर्मचार्‍याचा विनयभंग करून आत्महत्येचा प्रयत्न करणारा शिपाई बडतर्फ

असे वासनांध पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ?

इंदापूर तालुक्यामधील (जिल्हा पुणे) इयत्ता ९ ते १२ वी पर्यंतच्या ३३ शाळा चालू

इंदापूर तालुक्यात १०४ शाळा असून त्यात १८ सहस्र ६१० विद्यार्थी आहेत. त्यातील ३३ शाळा पहिल्या दिवशी चालू झाल्या आणि त्यामध्ये १ सहस्र ३८८ विद्यार्थी उपस्थित होते.