
पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढील ८ ते १० दिवसांत परिस्थिती पाहून दळणवळण बंदीचा निर्णय घेतला जाईल, असे सूतोवाच केले; मात्र सरसकट दळणवळण बंदी लागू करण्याचा विचार हा पूर्वपदावर येत असलेल्या अर्थचक्राला खीळ घालणारा ठरेल, असे मत शहरातील व्यापार्यांनी व्यक्त केले आहे.
‘मास्क’ नसल्यास दुकानात प्रवेश देऊ नये, नियमित निर्जंतुकीकरण करण्यात यावे, अशा सूचना व्यापार्यांना दिल्या असल्याचे पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया यांनी सांगितले. कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी कठोर निर्बंध निश्चित लादावेत मात्र अजूनही व्यापार तेवढ्या गतीने होत नसल्याने सरसकट दळणवळण बंदीचा प्रस्ताव कुणाच्याही हिताचा नसल्याचे मत ‘दी पूना मर्चंट्स चेंबर, मार्केटयार्डचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी व्यक्त केले.
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त