पंढरपूर येथील कुंभार घाट दुर्घटना प्रकरणी महादेव कोळी समाजाचे आंदोलन

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – येथील कुंभार घाटालगतची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ जणांचा बळी गेला होता. या घटनेला दीड मास लोटूनही अद्याप उत्तरदायी दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांना अटक झालेली नसल्याने ‘दोषी अधिकारी अन् ठेकेदार यांना अटक व्हायलाच हवी’, ‘संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा’, अशा घोषणा देत कार्तिकी वारीनिमित्त श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला येथे येत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न कोळी समाजाने केला. (अशी मागणी करावी लागणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक) शासनाने मृतांच्या वारसदारांना जाहीर केलेल्या मदतीची पूर्तता पूर्ण झालेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महादेव कोळी समाजाने महर्षि वाल्मीकि संघाचे संस्थापक-अध्यक्ष गणेश अंकुशराव यांच्या नेतृत्वाखाली कुंभार घाटाजवळ दुर्घटना घडलेल्या ठिकाणी घोषणा देत आंदोलन केले. या वेळी मोठ्या संख्येने कोळी बांधव उपस्थित होते.
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
पतीला सोडून देण्यासाठी प्रेयसीने पत्नीकडे केली १२ लाखांची मागणी !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !