पंढरपूर येथील कुंभार घाट दुर्घटना प्रकरणी महादेव कोळी समाजाचे आंदोलन

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – येथील कुंभार घाटालगतची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ जणांचा बळी गेला होता. या घटनेला दीड मास लोटूनही अद्याप उत्तरदायी दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांना अटक झालेली नसल्याने ‘दोषी अधिकारी अन् ठेकेदार यांना अटक व्हायलाच हवी’, ‘संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा’, अशा घोषणा देत कार्तिकी वारीनिमित्त श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला येथे येत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न कोळी समाजाने केला. (अशी मागणी करावी लागणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक) शासनाने मृतांच्या वारसदारांना जाहीर केलेल्या मदतीची पूर्तता पूर्ण झालेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महादेव कोळी समाजाने महर्षि वाल्मीकि संघाचे संस्थापक-अध्यक्ष गणेश अंकुशराव यांच्या नेतृत्वाखाली कुंभार घाटाजवळ दुर्घटना घडलेल्या ठिकाणी घोषणा देत आंदोलन केले. या वेळी मोठ्या संख्येने कोळी बांधव उपस्थित होते.
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
‘राजापूर रोड’ रेल्वेस्थानकात उद्वाहनाचे (लिफ्टचे) काम चालू
Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक
अवैध प्रवासी वाहतूक करणार्या मालवाहू वाहनांचे परवाने कायमचे रहित करणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री