वणीत कापसाची आवक घटली

बोंडअळी, बोंडसड यामुळे कापसाच्या उत्पन्नात पुष्कळ घट झाली आणि त्यामुळे कापसाची आवक घटल्याचे बोलले जात आहे. कापसाच्या उत्पन्नात होत असलेली घट शेतकर्‍यांची चिंता वाढवत आहे.

मध्यवर्ती असणारे प्रतापसिंह उद्यान बंद करू नका ! – प्रतापसिंह उद्यान बचाओ समितीचे आयुक्तांना निवेदन

प्रतापसिंह उद्यानाचा भाडे लिलावाच्या माध्यमातून होणारा बाजार हाणून पाडू ! – सौ. स्वाती शिंदे, नगरसेविका, भाजप

सिन्नर (नाशिक) येथील सहकारी संस्थेसह एका खासगी आस्थापनाच्या आर्थिक व्यवहारांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी

ईडीच्या या कारवाईच्या वृत्ताला शहर आणि ग्रामीण पोलिसांनी दुजोरा दिला आहे.

वेळेत अग्नीशमनाचा बंब न मिळाल्याने ७ एकरवरील उसाची हानी

बंब उपलब्ध न झाल्याने शेतकर्‍यांचा ऊस जळाले याची भरपाई कोण देणार ? उद्या एखादे घर-दुकाने यांना आग लागल्यावर बंब नसल्याने जीवितहानी झाल्यास त्याचे दायित्व कुणाचे ?

कळंबणी बु. (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री भैरी चाळकोबा मंदिरातील मूर्तीची तोडफोड आणि दानपेटीतील रकमेची चोरी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हिंदूंची मंदिरे असुरक्षित ! हिंदूंच्या धार्मिक स्थानांच्या संदर्भात अशा घटना सातत्याने घडणे, हे हिंदूबहुल भारतासाठी लाजिरवाणे !

महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर मनसे आणि भाजप यांची टीका

महाविकास आघाडीची वर्षपूर्ती म्हणजे केवळ दिखावा आहे. या सरकारला राज्याचा विकास करायला जमलेले नाही. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. रोजगार, नोकर्‍या यांचा प्रश्‍न आहे. विकासाच्या संदर्भात शून्य प्रगती असून कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या प्रमाणात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे

सांगवे येथे अपघातात २ ठार, ४ जण घायाळ

तालुक्यातील केळीचीवाडी, सांगवे येथे दुचाकी आणि रिक्शा यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील अमित प्रभाकर मेस्त्री आणि परशुराम अनंत पांचाळ हे दोघे जागीच ठार झाले

राजापूरचे वाहतूक नियंत्रक एस्.टी. सेवेतून बडतर्फ

बनावट शिक्का मारून आणि जादा पैशांची आकारणी करून एस्.टी. पासच्या विक्रीत २३ सहस्र ३६० रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणी निलंबित असलेले येथील वाहतूक नियंत्रक अभिजीत बाकाळकर एस्.टी. सेवेतून बडतर्फ !

वृद्ध महिलेवर चाकूने आक्रमण करणार्‍याला ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

वर्ष २०१९ मध्ये एका वृद्ध महिलेवर चाकूने आक्रमण करणार्‍या आरोपीला जिल्हा न्यायालयाने दंड आणि ७ वर्षे सक्तमजुरी, अशी शिक्षा ठोठावली.

आवक वाढल्याने भाजीपाल्यांचे दर अल्प झाले !

वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला बाजारपेठेमध्ये गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याची आवक वाढू लागल्याने भाजीपाल्यांचे दर ५० टक्क्यांनी अल्प झाले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.