माघ यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर शहर आणि परिसरातील गावांमध्ये २४ घंट्यांसाठी संचारबंदी

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे २३ फेब्रुवारी या दिवशी होणार्‍या माघ वारीच्या पार्श्‍वभूमीवर २२ फेब्रुवारीच्या रात्री १२ पासून ते २३ फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजेपर्यंत २४ घंट्यांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनामुळे यात्राकाळात भाविकांना शहर प्रवेश बंदी असणार आहे

अमरावती शहरातून अपहरण झालेल्या ४ वर्षांच्या मुलाची नगर पोलिसांनी केली सुटका

अमरावती शहरातून अपहरण करून नगर शहरात आणलेल्या नयन मुकेश लुणीया या ४ वर्षीय मुलाची येथील जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेने सुखरूप सुटका केली. या प्रकरणी एका धर्मांध महिलेसह ५ धर्मांधांना पोलिसांनी अटक केली आहे.

गोरक्षक अंकुश गोडसे यांच्या स्वदेशी गोमूत्र अर्क यंत्रनिर्मितीच्या पहिल्या टप्प्यातील बॉयलयरचे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या हस्ते पूजन आणि उद्घाटन !

‘हे यंत्र गोशाळांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे, वापरण्यास सोपे, दीर्घायुषी आणि स्टेनलेस स्टील या धातूपासून बनवण्यात आले आहे. गेल्या ५ वर्षात भारतभर जवळपास ५०० गोशाळांत अशा यंत्रांची स्थापना करण्यात आली आहे. येणार्‍या वर्षात ३०० गोशाळांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

समाजात विषवल्ली पसरवणारे, तसेच देशद्रोहाचा गुन्हा नोंद असलेल्या कन्हैयाकुमार याचे जाहीर व्याख्यान रहित करा !

देहली येथील ‘जे.एन्.यू.’ विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमार याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद असून त्याला न्यायालयाने अंतरिम जामीन दिला आहे. हाच कन्हैयाकुमार २० फेब्रुवारी २०२१ या दिवशी कोल्हापूर येथे जाहीर व्याख्यान देण्यासाठी येत आहे.

वेब सीरिज आणि चित्रपट यांतून हिंदु धर्माचे वस्त्रहरण होत असतांना नाना पटोले झोपले होते का ? – अजयसिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेना

‘‘नाना हे सर्व प्रसिद्धीसाठी करत आहेत. अभिताभ बच्चन आणि अक्षयकुमार यांच्या चित्रपटांना करणी सेना संरक्षण देईल. पटोले यांच्या गुंडगिरीला त्याप्रमाणेच उत्तर देऊ.’’

अभिनेत्री दीया मिर्झा यांनी स्वतःच्या विवाहामध्ये कन्यादान परंपरा वगळली !

कन्यादान करणार्‍या व्यक्तीच्या मागील १२ पिढ्या, पुढच्या १२ पिढी आणि स्वतःची १ पिढी यांचा उद्धार होतो, असे धर्मशास्त्र सांगते. मात्र फुकाचा पुरोगामीपणा मिरवण्यासाठी अशी टूम सध्या निघाली आहे. हिंदूंनी यापासून सावध रहावे !

किल्ले रायगडावर शिवजयंती आणि छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक उत्साहात साजरा !

छत्रपती संभाजी महाराज यांचा तिथीनुसार ३४७ वा राज्याभिषेक सोहळा, तर दिनांकाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ शिवजयंती एकाच दिवशी आली आहे. राज्याभिषेक सोहळ्यासमवेत छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंतीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कोरोनाशी लढतांना छत्रपती शिवरायांची प्रेरणा आणि जिद्द आम्हाला मिळते ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

छत्रपती शिवराय आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवराय आहेत. छत्रपती दैवत का आहेत, तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात होती. कोरोनाशी लढतांना ही प्रेरणा आणि जिद्द आम्हाला मिळत आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.

मुंबई महानगरपालिकेकडून धडक मोहीम

मॉल, रेल्वेस्थानके, समारंभ, हॉटेल आदी ठिकाणी विविध पथके मास्क घालणे बंधनकारक असल्याचे प्रबोधन करून न घालणार्‍यांना दंडही करण्यात येत आहे. जम्बो कोविड सेंटरच्या सुविधा चालू करण्यात आल्या आहेत, असे महापौरांनी सांगितले. 

कोरोनाविषयी सूक्ष्म नियोजन करा आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा ! – राजगोपाल देवरा, पालकसचिव

कोरोनाविषयी प्रतिदिनच्या चाचण्या वाढवा, व्हेंटिलेटर्स आणि उपलब्ध साधनसामुग्रीचा आढावा घ्या, सनियंत्रण करा. कोरोनाविषयी सूक्ष्म नियोजन करा आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग (संपर्क शोध मोहिम) वाढवा, अशी सूचना पालकसचिव राजगोपाल देवरा यांनी केली.