यापुढे मुंबईमध्ये घरातील विलगीकरण बंद, संशयित व्यक्तीला ‘कोविड सेंटर’ मध्ये जावेच लागेल ! – सौ. किशोरी पेडणेकर, महापौर

यापुढे कोरोनाची लक्षणे नसलेल्या नागरिकांनाही घरात विलगीकरण करण्यात येणार नाही. प्रत्येकाला ‘कोविड सेंटर’मध्ये जावेच लागेल, अशी सक्त सूचना मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी १९ फेब्रुवारी या दिवशी दिली.

२१ फेब्रुवारीला मिरज येथे कृष्णामाई उत्सव ! – ओंकार शुक्ल, संयोजक

कृष्णा नदी ही महानदी म्हणून ओळखली जाते. कृष्णा नदीचा उत्सव महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक राज्यात केला जातो; मात्र मिरज शहरात तो होत नव्हता. गतवर्षीपासून या उत्सवाचा प्रारंभ करण्यात आला आहे, अशी माहिती या उत्सवाचे संयोजक श्री. ओंकार शुक्ल यांनी दिली.

घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांना विधानसभा अध्यक्षांसंबंधी विचारणा करण्याचा अधिकार आहे ! – सुधीर मुनगंटीवार, नेते, भाजप

राज्यपाल राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांची निवड करण्याविषयी राज्यशासनाला प्रश्‍न विचारण्याचा अधिकार राज्यपालांना आहे, असे मत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी १८ फेब्रुवारी या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणी २ परिचारिकांवर गुन्हा नोंद

९ जानेवारी या दिवशी रात्री २ वाजता येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतीदक्षता नवजात केयर युनिटमध्ये लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता.

विवाह समारंभ, मंगल कार्यांसाठी ५० जणांचीच मर्यादा ! – डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी

उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालय आस्थापना आणि कार्यक्रमांचे यजमान दोघांवरही कारवाई

जत्रा, यात्रा, उरुस भरवण्यास मनाई; केवळ धार्मिक विधी करण्यास अनुमती ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली

उपविभागीय दंडाधिकारी यांनी ज्या ठिकाणी धार्मिक विधी होणार आहे, त्या ठिकाणचे पर्यवेक्षण करून नियंत्रण ठेवावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.

केरळमधून पुण्यात येणार्‍या सर्व प्रवाशांसाठी आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी अनिवार्य !

येथील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुणे महानगरपालिकेने १८ फेब्रुवारीपासून शहराच्या हद्दीत प्रवासांवरील निर्बंध वाढवले आहेत. पुणे महानगरपालिकेने केरळमधून पुण्यात येणार्‍या सर्व प्रवाशांसाठी आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी अनिवार्य केली आहे.

१८ फेब्रुवारी या दिवशी मुंबईत ७३६ कोरोनाबाधित रुग्ण आढलले, तर ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ५ हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या इमारती सील करण्याची सूचना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.

शासनाने वैधानिक विकास महामंडळ बंद करून विदर्भ-मराठवाडा येथील जनतेचा विश्‍वासघात केला ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, भाजप

तसेच १ मार्चपासून चालू होणारे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वीज देयकाच्या प्रश्‍नांसह अनेक सूत्रांच्या अनुषंगाने वादळी ठरणार आहे, असेही ते म्हणाले.  

अर्थसंकल्पीय अधिवेशन दीर्घकाळ चालवण्यासाठी आरोग्य विभागाकडून आठवड्याला ३ दिवसांची सुट्टी घेण्याचा पर्याय

यामुळे ४ दिवसांच्या कामकाजात कुणाला कोरोनाची लागण झाली असल्यास त्याची लक्षणे ३ दिवसांच्या सुट्टीच्या कालावधीत दिसून येतील. त्यानंतर पुढच्या आठवड्यात चाचणी केल्यास कुणाला कोरोनाची लागण झाली असल्यास स्पष्ट होईल, असे आरोग्य विभागाने सुचवले आहे.