भारतातील युवकांची भयावह दु:स्थिती !

आजच्या बहुसंख्य युवकांसमोर विशिष्ट असे कोणतेच ध्येय किंवा आदर्श नाही. शीड नसलेले जहाज जसे वाऱ्यासमवेत सागरात कुठेही भरकटते, तसाच आजचा युवक आहे. युवकांमधील विकृती वाढत आहेत. ‘हे वेळीच रोखले नाही, तर विकासापेक्षा विनाशच होणार आहे’, हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही !

अल्पवयिनांमधील हिंसकता !

‘आई-वडील मुलाला वळण लावण्यात न्यून पडले असावेत का ? वडिलांचे पिस्तूल घेऊन पुढील कुकर्म करण्याचे धाडस त्याच्यात आले तरी कुठून ? मृतदेहासमवेत ३ दिवस बसण्याइतका तो निष्ठूर आणि निर्दयी कशामुळे झाला असेल ?’, असे अनेक प्रश्न अनुत्तरितच रहातात. त्याची उत्तरे ना समाजाकडे आहेत, ना सरकारकडे !

‘ऑनलाईन’ जुगार थांबवा !

‘भरघोस आर्थिक उत्पन्नासाठी राष्ट्र रसातळाला गेले तरी चालेल’, ही वृत्ती सध्या जोर धरत आहे. त्यामुळे सरकारने ऑनलाईन जुगार थांबवण्याविषयी योग्य ती कठोर पावले उचलायला हवीत, अन्यथा जुगारामुळे होणारे सामाजिक दुष्परिणाम भयावह असून त्यामुळे राष्ट्राची सर्व प्रकारे हानी होऊ शकते. असे झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ?

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

बाहेर खाद्यपदार्थ कशा पद्धतीने बनवले जातात, हे आपण सामाजिक संकेतस्थळांवर पहातो. कुणी ते पदार्थ उष्टे करतात, तर कुणी त्यात थुंकतात. काही ठिकाणी ते पदार्थ उंदीर खात असतात, तर काही ठिकाणी ते पदार्थ अत्यंत अस्वच्छ वातावरणात बनवले जातात.

मदुराई वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महर्षि चरक यांच्या नावाने शपथ घेतल्याने अधिष्ठाता निलंबित !

तमिळनाडूतील  द्रमुक सरकारचा हिंदुद्वेष ! सध्या हिप्पोक्रेटसच्या नावाने विद्यार्थी शपथ घेतात, तो पाश्चात्त्य वैद्य आहे; मात्र महर्षि चरक हे भारतीय आहे; मात्र जे जे हिंदूंचे आहे, ते नाकारण्याची द्रमुक सरकारची रित आहे. तीच या कृतीतून पुन्हा एकदा प्रकट झाली !

मांद्रे येथे ‘सनबर्न’ महोत्सव नको ! – जीत आरोलकर, आमदार, मगोप

ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने गोव्यात ‘सनबर्न’ महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवात अमली पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्‍वभूमीवर आमदार जीत आरोलकर यांनी ही भूमिका घेतली आहे.

अतिरेक टाळा !

लहान मुलांची पालटती जीवनशैली आणि आहार यांमुळे त्यांच्यावर कसे परिणाम होत आहेत, याविषयी ‘भारतीय बालरोगतज्ञ संघटने’चे राष्ट्रीय अध्यक्ष आधुनिक वैद्य उपेंद्र किंजवडेकर यांनी सांगितलेली सर्वांनाच विचार करायला लावणारी ही माहिती !

युवा पिढीचे विविध षड्यंत्रांपासून रक्षण करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य ! – अतुल अर्वेन्ला, हिंदु जनजागृती समिती

आपली युवा पिढी भरकटत आहे. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, जिजामाता, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जाज्वल्य इतिहासाची पुन्हा आठवण करून दिल्यास ते सन्मार्गावर येतील.

सौंदर्य स्पर्धा नको !

सौदर्यं स्पर्धांमुळे मुलींवर आणि लहान मुलांवरही अयोग्य संस्कार होणार, हे नक्की ! सद्यःस्थितीत जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लहानपणापासूनच हिंदवी स्वराज्य आणि हिंदु धर्म यांचे संस्कार केले, तसे संस्कार करणे आवश्यक आहे. राणी लक्ष्मीबाई, राणी चेन्नम्मा, अहिल्यादेवी होळकर यांसारख्या कर्तृत्ववान विरांगनांचे अनुकरण करण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या स्पर्धा भरवणेच योग्य !

वाढदिवसाची विकृती !

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे वर्षातून एकदा व्यक्तीला शुभेच्छा देण्यासाठीच्या चांगल्या कृतीची जागा भयावह विकृतीने घेतली आहे. समाजामध्ये या विकृतींविषयी जनजागृती न केल्यास आणि धर्मशिक्षण न दिल्यास या पुढचे अपप्रकार पहायला मिळाले नाही तर नवलच ! अशी वेळ न येण्यासाठी हिंदु धर्मानुसार वाढदिवस कसा साजरा करावा, हे सांगणे आवश्यक !