संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे २९ जूनला श्रीक्षेत्र आळंदीहून प्रस्थान !

पायी आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी परंपरेनुसार ज्येष्ठ कृष्ण अष्टमीला, म्हणजे २९ जून या दिवशी श्रीक्षेत्र आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करेल. १७ जुलैला आषाढी एकादशी असून ही पालखी १६ जुलैला पंढरपूरला पोचेल.

आळंदी (पुणे) येथील ज्ञानेश्वर माऊलींच्या ‘सिद्धबेटा’तील सभागृहाची दुरवस्था !

सिद्धबेट येथे ‘राज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्या’तून लाखो रुपये व्यय करून वारकर्‍यांसाठी सभागृह बांधण्यात आले आहे; परंतु त्याचा वापर होत नसल्याने सर्वत्र अस्वच्छता, कचरा, धूळ, तसेच मद्याच्या रिकाम्या बाटल्याही येथे आढळल्या.या सभागृहाकडे आळंदी नगर परिषदेचेही दुर्लक्ष होत आहे.

संत ज्ञानेश्‍वर महाराजांचे उपासनास्थान सिद्धबेट (आळंदी) एक दुर्लक्षित ऊर्जास्रोत !

जगभरातून प्रतिवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात; परंतु आळंदीमध्येच ‘सिद्धबेट’ नावाचे एक लहानसे बेट आहे.

पूर्वीच्या संतांचा समृद्ध वारसा प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज चालवत आहेत ! – डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

त्या प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या ‘गीताभक्ती अमृत महोत्सवा’मध्ये त्या बोलत होत्या.

‘एम्.आय.डी.सी.’च्या वतीने पुढील ५ वर्षे १० लाख रुपये मराठी संत साहित्य संमेलनासाठी देणार !- पालकमंत्री उदय सामंत

वारकरी संप्रदायाचा विचार  ज्याने ज्याने घेतला, तो जगात नावारूपाला आला. ते विचार जपले पाहिजेत, भक्त पुंडलिकाप्रमाणे आई-बापांची सेवा मुलांनी केली पाहिजे.

ज्ञानवापीविषयी मुसलमानांनी सामंजस्य दाखवावे !(Gyanvapi Muslim Cooperation Expected)

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांचा विचार विश्‍वकल्याणाचा आहे. श्रीमद्भगवद्गीतेच्या माध्यमातून भक्तीची गंगा वाहिली आहेे. मानवतेच्या सर्वांगीण विकासासाठी वेदांची आवश्यकता आहे.

भारतीय संशोधनपद्धत आणि संत वाङ्मयाचा अभ्यास करण्याची पद्धत !

पाश्चात्त्य देशांत इतिहास अबाधित राखण्यासाठी जे प्रयत्न होतात, त्याप्रमाणे भारतियांनी स्वदेशाचा इतिहास संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत !

समाधी परिपूर्ण बैसले ज्ञानेश्वर !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी ही जागृत असून ते आजही प्रचीती देतात. प्रत्येक भक्ताचा जसा भाव असेल, तसे ज्ञानदेव अनुभवाला येतात. त्या समाधी स्थानाची स्पंदने अफाट आणि अलौकिक अशी आहेत.

दिंडीला पोलीस बंदोबस्त देण्याची वारकर्‍यांची मागणी !

कार्तिकी वारीला पुणे-मुंबई महामार्गावरून आळंदीकडे येणार्‍या वारकर्‍यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !

वारकर्‍यांची असुविधा टाळण्यासाठी ग्रामस्थांकडून ‘आळंदी बंद’ मागे !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यास आजपासून आरंभ झाला; मात्र आळंदी मंदिर विश्वस्त निवडीवरून आळंदीकरांनी ५ डिसेंबरला गावबंदची घोषणा केली होती.