पंढरपूर पालखी मार्गावरील वाखरी येथील प्राचीन बाजीराव विहीर जतन करण्यास यश !

पंढरपूर-पुणे पालखी महामार्गाचे राष्ट्रीय महामार्ग करण्याचे काम चालू आहे. हे काम करतांना वाखरी-भंडीशेगाव दरम्यान असलेल्या बाजीराव विहिरीचा अडथळा येत असल्याने ती बुजवण्याचे काम चालू होते. ही विहीर ऐतिहासिक असल्याने ती बुजवण्यास ग्रामस्थांनी विरोध केला.

कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यावरील खटल्याची सुनावणी १६ डिसेंबरला

कनिष्ठ न्यायालयातील निकालाला सत्र न्यायालयात दाद मागतांना इंदुरीकर महाराज यांच्या वतीने सादर करण्यात आलेली कागदपत्रे अपूर्ण होती. ती पुराव्यांची संपूर्ण कागदपत्रे प्रमाणित करून घेऊन सत्र न्यायालयात सादर करावीत, असा आदेश न्यायालयाने त्यांच्या अधिवक्त्यांना दिल्यामुळे त्यांच्यासंबंधीच्या खटल्याची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली.

चिंचवडमधील एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल विरोधात पालकांचा फलकाद्वारे निषेध !

पालकांनी केवळ निषेध नोंदवून न थांबता मनमानी कारभार करणार्‍या शाळा प्रशासनाला चूक दुरुस्त करायला लावणे अपेक्षित आहे.

मत देता म्हणजे तुम्ही नेत्यांना विकत घेत नाही ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी व्यापार्‍यांना फटकारले

तुम्ही मते देऊन नेत्यांना विकत घेत नाही, अशा शब्दांत येथील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी व्यापार्‍यांना फटकारले. येथील न्यू मार्केट परिसरामधील एका इमारतीच्या भूमीपूजनच्या कार्यक्रमाच्या वेळी त्या बोलत होत्या.

(म्हणे) ‘तालिबानी पुरस्कार देऊन शिर्डी संस्थानचा सत्कार करू !’

३१ डिसेंबरपर्यंत फलक हटवला नाही, तर आम्ही पुन्हा शिर्डीत येऊन आंदोलन करू. त्या वेळी आम्ही शिर्डी संस्थानला ‘तालिबानी पुरस्कार’ देऊन सत्कार करू आणि त्यांच्या निर्णयाचा निषेध करू, अशी वल्गना तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.

इयत्ता १० वी आणि १२ वी च्या परीक्षा अर्जामध्ये विद्यार्थ्यांच्या उल्लेखामध्ये ‘हिंदु’ धर्माचा पर्यायच नाही

हिंदु धर्माचा उल्लेख करून त्यामध्ये अन्य कुणाला समभाग अपेक्षित आहे, याची टीपही अर्जात देता आली असती. तसे न करता बहुसंख्य हिंदु धर्माला डावलून त्याऐवजी ‘नॉन मायनॉरिटी’ असा हेतुपुरस्सर उल्लेख करणाऱ्यांचा हिंदुद्वेष यातून उघड होत आहे.

धुळे येथे पोलिसांनी धर्मांधांकडून ३१ तलवारी कह्यात घेतल्या : दोघांना अटक

तलवारींचा साठा मालेगावातून आणल्याचे उघड – या प्रकरणाचा मालेगावशीही संबंध येत असल्याने पोलिसांनी वरवरची कारवाई न करता याची पाळेमुळे खोदून धर्मांधांविरोधात कठोरात कठोर कारवाई करायला हवी !

धर्मांधांकडून खारघर येथील गोशाळेतील गायींची दुसर्‍यांदा चोरी

पहिल्या चोरीच्या प्रकरणात कर्तव्यचुकार पोलिसांनी कारवाई न केल्याचा परिणाम !

राज्यात कोरोनाच्या लसीकरणासाठी प्राधान्यक्रम निश्‍चित

आरोग्य कर्मचार्‍यांच्या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर व्यवस्था करण्यात येणार असून एका ठिकाणी १०० जणांना लस दिली जाईल.

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

जोपर्यंत न्यायालय मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उठवत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र शासनाला नोकर भरती प्रक्रिया आणि शैक्षणिक प्रवेश यांमध्ये आरक्षण लागू करता येणार नाही.