पहिल्या चोरीच्या प्रकरणात कर्तव्यचुकार पोलिसांनी कारवाई न केल्याचा परिणाम !
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना गायींची होणारी चोरी म्हणजे धर्मांध गोतस्करांना कायदा आणि पोलीस यांचे कोणतेही भय राहिले नसल्याचेच यातून दिसून येते. गायींची चोरी होत असतांनाही त्यावर कोणतीही कारवाई न करणार्या पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी गोप्रेमींची मागणी आहे ! – संपादक

पनवेल – खारघर रेल्वेस्थानकाच्या जवळ असलेल्या नंदिनी गोशाळेत ५ डिसेंबरला रात्री ७ धर्मांधांनी गोसेवकांना शस्त्राचा धाक दाखवून २ गायी आणि एक वासरू चोरून नेले. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दीड वर्षापूर्वी धर्मांधांनी या गोशाळेतून अशाच प्रकारे गायींची चोरी केली होती; मात्र तेव्हा पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. ‘अनधिकृत कत्तलीसाठी गोशाळेतील जनावरांची चोरी केली जात आहे’, असा आरोप पूज्य गोळवलकर गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नंदिनी गोशाळेचे संचालक शैलेश खोतकर यांनी केला आहे.
| खारघरसारख्या शहरात गोशाळेतील गायींची चोरी होणे हा गंभीर विषय आहे. यापूर्वीही असा निंदनीय प्रकार घडला असून संबंधितांवर कारवाई व्हायला हवी ! – बिना गोगरी, अध्यक्षा, भारत रक्षा मंचाच्या महिला मोर्चा |
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)