‘अर्जुन पुरस्कार’ प्राप्त सुभेदार अजय सावंत यांचा पणजी (गोवा) आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्कार

सुभेदार अजय सावंत यांचा सत्कार ! ‘कोणतेही राष्ट्र त्यातील सैनिक, किसान आणि शिक्षक या ३ क्षेत्रांच्या आधारावर टिकून रहाते. सैनिक प्राण तळहातावर घेऊन देशासाठी लढत असतो. त्यांचा सन्मान हा देशाचा सन्मान असतो.

प्रताप सरनाईक यांच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाकडून संरक्षण, सूडबुद्धीने कारवाई न करण्याचे निर्देश

शिवसेनेचे आमदार प्रतापसिंह सरनाईक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावर सध्या कोणतीही कारवाई करू नये, असा आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेला संरक्षण दिले आहे. ‘कोणतीही कारवाई सूडबुद्धीने करू नये’, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

महाराष्ट्रात ‘भारत बंद’ पाळून ठिकठिकाणी आंदोलन आणि फेरी यांचे आयोजन

कृषी विधेयकाच्या विरोधात महाराष्ट्रात आयोजलेला ‘भारत बंद’ चा तपशील येथे देत आहोत.

सिंधुदुर्गातील सर्व सत्तास्थानांवर भगवा फडकवा ! – अरुण दूधवडकर, जिल्हा संपर्कप्रमुख, शिवसेना

कणकवली तालुका शिवसेनेच्या माध्यमातून येथील मातोश्री मंगल कार्यालयात दूधवडकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

अजानची स्पर्धा सार्वजनिकरित्या आयोजित करण्यास मी विरोध दर्शवला ! – पांडुरंग सकपाळ, विभागप्रमुख, शिवसेना

मुंबादेवी विधानसभेतील ‘फाऊंडेशन फॉर यू’ नावाच्या संस्थेने अजानची सार्वजनिकरित्या स्पर्धा आयोजित केली होती. मी त्यांना कोरोनाविषयक नियम अवगत करून देत स्पर्धा सार्वजनिकरित्या आयोजित करण्यास विरोध दर्शवला, असे स्पष्टीकरण दक्षिण मुंबईचे शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी केले.

मी हिंदु, धर्माचा प्रश्‍न येईल तेव्हा धर्माच्या बाजूने बोलेन !

मी कर्माने आणि धर्मानेही हिंदु आहे. हिंदुत्व हा माझ्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. मी हिंदु धर्माविषयी बोलू शकते; मात्र आतापर्यंत बोलण्याची आवश्यकता भासली नाही; मात्र जेव्हा धर्माचा प्रश्‍न येईल, तेव्हा हिंदु धर्माच्या बाजूने बोलेन, असे वक्तव्य अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केले.

मुंबईमध्ये पांडुरंग सकपाळ यांच्याकडून ‘ऑनलाईन’ अजान स्पर्धेचे आयोजन

अजानची स्पर्धा काफिरांनी आयोजित करणे इस्लामला मान्य आहे का ? अशी स्पर्धा आयोजित करण्यापूर्वी ‘इस्लामी धर्मगुरूंचे मत काय आहे ?’, हे जाणून घेतले असते, तरी ही स्पर्धा आयोजित करण्याचा खटाटोप केला नसता !

कंगना राणावत यांचे कार्यालय पूर्ववत करून देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश.

या प्रकरणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे, ‘‘कंगना यांच्या कार्यालयाच्या नुकसानीचा व्यय मुख्यमंत्र्यांच्या खिशातून करावा. या सुडाच्या राजकारणाचा भुर्दंड सरकारी तिजोरीतून कशाला ?”

राजकारण म्हणून ‘हिंदुत्व’ करू नका  ! –  उद्धव ठाकरे

मुंबई महानगरपालिकेच्या भोवती आमची भक्कम तटबंदी आहे. ज्यांना लढाई करायची खुमखुमी असेल, त्यांनी डोके आपटून बघावे. मुंबई महापालिका शिवसेनेकडेच येईल-उद्धव ठाकरे

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या निकटवर्तियाला अटक

ईडीने मंगळवारी सरनाईक यांच्या घरी आणि त्यांच्याशी संबंधित कार्यालये अशा १० ठिकाणी धाडी टाकल्या.