सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत अतीमुसळधार पावसाची चेतावणी

पावसामुळे आतापर्यंत जिल्ह्यात १ व्यक्तीचा, तर ४ गुरांचा मृत्यू झाला आहे. ६ सार्वजनिक मालमत्तांची हानी झाली आहे. पुराचे पाणी घरात घुसल्याने सध्या ३९ कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली आहेत.

चातुर्मासाच्या निमित्ताने श्री सांस्कृतिक भवन येथे आज कलश स्थापना ! – विजय पाटील, प्रतिमा विद्या प्रतिष्ठान

१६ जुलैला श्री सांस्कृतिक भवन, आर्.के.नगर येथे दुपारी १ वाजता चातुर्मास कलश स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘प्रतिमा विद्या प्रतिष्ठान’चे अध्यक्ष श्री. विजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपणारा ‘वक्फ कायदा’ रहित करा ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शाहू महाराजांनी मुसलमान तथा अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या ‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बळकावण्याची प्रक्रिया वक्फ बोर्डाने चालू केली आहे. त्यामुळे समाजात संतापाची लाट !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात साथरोगांच्या पार्श्वभूमीवर १०३ गावे जोखीमग्रस्त

भातशेतीच्या हंगामात ‘लेप्टोस्पायरोसिस’चा संसर्ग होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत.

गोवा सरकारने म्हादई अभयारण व्याघ्र क्षेत्र घोषित करावे ! – ‘म्हादई बचाव अभियान’

गोवा सरकारने म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित केल्यास म्हादई जलवाटप तंटा प्रकरणी न्यायालयात कर्नाटकच्या विरोधात आपली बाजू भक्कम झाली असती. या एकाच निर्णयाने म्हादई जलवाटप तंटासंबंधीचा प्रश्न पूर्णपणे निकालात निघाला असता !

कर्नाटकमध्ये यावर्षी ‘महिष दसरा’ (महिषासुराची जयंती) साजरा करणार !

हिंदु धर्माच्या विरोधात कृती करून असुरांना आदर्श ठरवणारे स्वतःही त्याच मानसिकतेचे आहेत, असे कुणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये !

१०८ कामकुमारनंदी महाराज यांच्या हत्येचे उच्चस्तरीय अन्वेषण करा ! – विश्‍व हिंदु परिषद आणि साधू-संत यांची पत्रकार परिषदेत मागणी

बेळगाव येथील १०८ कामकुमारनंदी महाराज यांच्या हत्येचे उच्चस्तरीय अन्वेषण करावे, अशी मागणी विश्‍व हिंदु परिषद आणि साधू-संत यांनी ११ जुलैला कन्नड साहित्य भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत केली.

अजित पवार मुख्‍यमंत्री होणार असल्‍याच्‍या अफवा यशस्‍वी होणार नाहीत ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

जितदादा सरकारमध्‍ये सहभागी झाल्‍यानंतर ते मुख्‍यमंत्री होणार आहेत, असे कोण पिकवत आहे, त्‍यांचे मनसुबे यशस्‍वी होणार नाहीत, असे मत राज्‍याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ६ जुलै या दिवशी पत्रकार परिषदेत केले.

शरद पवार गटाच्‍या राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांचे निलंबन !

शरद पवार गटाच्‍या राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाच्‍या कार्यकारिणीची बैठक ६ जुलै या दिवशी देहली येथे झाली. या बैठकीमध्‍ये राष्‍ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षातून निलंबित करण्‍यात आले आहे.

धर्मांतरविरोधी आणि गोहत्याबंदी कायदे रहित केल्यास रस्त्यावर उतरू !

पत्रकार परिषदेत साधू-संतांनी सांगितले की, सरकारकडून या संदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यात आले, तर ते हिंदूंच्या भावनांच्या विरोधात समजले जाईल आणि यामुळे समाजामध्ये अशांतता निर्माण होईल.