विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमणावर घाव घालण्याची हीच वेळ ! – नितीन शिंदे, माजी आमदार

आता ‘विशाळगड मुक्ती आंदोलना’च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमणावर घाव घालण्याची हीच वेळ आहे, असे प्रतिपादन माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी केले.

अखिल भारत हिंदु महासभेच्या कार्यकर्ता मेळाव्यात हिंदुत्वाचे कार्य जोमाने पुढे नेण्याचा निर्धार !

‘अखिल भारत हिंदु महासभे’च्या वतीने हिंदु एकता आंदोलनाच्या कार्यालयात १३ जुलैला आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात हिंदुत्वाचे कार्य जोमाने पुढे नेण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपणारा ‘वक्फ कायदा’ रहित करा ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शाहू महाराजांनी मुसलमान तथा अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या ‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बळकावण्याची प्रक्रिया वक्फ बोर्डाने चालू केली आहे. त्यामुळे समाजात संतापाची लाट !

कराड येथील श्री उत्तरालक्ष्मी मंदिराच्या मिळकतीवर वक्फ बोर्डाचा डोळा !

श्री उत्तरालक्ष्मी मंदिर परिसरातील जागेवर मुसलमान समाजाची स्मशानभूमी आहे. ती मूळची गायरान पैैकी भूमी असून सातारा जिल्हाधिकारी यांचे हु.नं. एल्.एन्.डी./२४००/१९३१ अन्वये मुसलमान स्मशानभूमीकडे ठेवण्यात आलेली (असाईन) आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये हिंदूंच्या धर्मांतराच्या प्रयत्नात असणार्‍या ११ ख्रिस्ती मिशनर्‍यांना अटक

कठोर धर्मांतरविरोधी कायदा नसल्यानेच अशा लोकांचे फावते आहे !

कर्नाटकमध्ये क्षुल्लक कारणावरून हिंदुत्वनिष्ठ संघटना युवा ब्रिगेडच्या कार्यकर्त्याची निर्घृण हत्या !

या प्रकरणी मणीकंठ आणि संदेश यांना अटक करण्यात आली असून अन्य ४ जण अद्याप पसार आहेत. येथे हनुमान जयंतीच्या निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती. तेव्हा हा वाद झाला.

हिंदु युवतीशी विवाह करण्यासाठी हिंदु धर्म स्वीकारलेल्या रोशन अली याने विवाहानंतर पत्नीचे केले बलपूर्वक धर्मांतर !

हिंदु मुलींना मुसलमान बनवण्यासाठी येनकेन प्रकारेण प्रयत्न केले जात आहेत, त्याचे हे उदाहरण ! धर्मांध मुसलमानांच्या अशा क्लृप्त्यांपासून सावधान !

गोव्यातील पोर्तुगीज नावे पालटण्याच्या कामाला ‘वास्को’ नाव पालटण्यापासून प्रारंभ करा ! – प्रा. सुभाष वेलिंगकर, ‘भारत माता की जय’ संघ

संपूर्ण देशात शहर किंवा एखादा परिसर यांची नावे पालटण्याच्या मोहिमेला प्रारंभ झालेला आहे. ‘बाम्बे’चे नाव मुंबई, ‘बेंगलोर’चा उल्लेख ‘बेंगळुरू’, मद्रासचे नाव ‘चेन्नई’ असा करण्यात आले आहे. गोव्यातही नामांतराची ही मोहीम राबवली पाहिजे.

भारतातील हिंदूंच्‍या धार्मिक भावनांची स्‍थिती जाणा !

शाहजहांपूर (उत्तरप्रदेश) येथील हनुमान मंदिराच्‍या जवळ एका गोणीत गोमांस सापडले आहे. याची माहिती हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांना मिळाल्‍यानंतर त्‍यांनी येथे रस्‍ता बंद करून निदर्शने केली.

अंधेरी (मुंबई) येथे श्रीराम मंदिराजवळील भूमी कब्रस्थानासाठी देण्याची शिवसेनेच्या नेत्यांची मागणी !

श्रीरामाच्या मंदिराजवळ कब्रस्तानाची मागणी हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्‍या सरकारमधील नेत्याने करणे हे दुर्दैवी आहे. श्रीरामाच्या मंदिराजवळ कब्रस्तानासाठी जागा दिल्यास विरोध करू, अशी भूमिका सकल हिंदु समाजाकडून करण्यात आली आहे.