गुढीपाडवा म्हणजे संकल्पशक्तीची मुहूर्तमेढ !

गुढीपाडवा म्हणजे संकल्पशक्तीची मुहूर्तमेढ !

गुढीपाडवा हा हिंदूंचा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी रामतत्व १०० पटीने अधिक कार्यरत असते. गुढीच्या माध्यमातून कार्यरत असलेली ईश्‍वराची शक्ती जिवाला लाभदायक असते.

गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाचे पंचांग पूजन आणि श्रवण

गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाचे पंचांग पूजन आणि श्रवण

गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांगावरील गणपतीचे पूजन करावे आणि पंचांगात दिलेले वर्षफल वाचावे. जुन्या काळात हे वर्षफल प्रत्येक घरी जाऊन ज्योतिषी वाचत असत. तो गुढीपाडव्याचा एक विधीच होता.

जीवनाचे गुह्य ज्ञान शिकवणारी गुढी !

जीवनाचे गुह्य ज्ञान शिकवणारी गुढी !

जीवनात काय साध्य करायचे आहे, याचे गुढी हे प्रतीक आहे. गुढी हे त्यागमय जीवन जगण्याचे प्रतीक आहे. जीवनाचा आदर्श असलेली गुढी आपल्याला आपल्या जीवनाचे गुह्य ज्ञान दाखवते.

चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेस वर्षारंभ करण्याची कारणे

चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेस वर्षारंभ करण्याची कारणे

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला प्रारंभ झाला, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.

नववर्षाचा संकल्प !

नववर्षाचा संकल्प !

येत्या नववर्षाच्या भीषणतेमध्ये तरून जाण्यासाठी प्रभु श्रीरामचंद्राला शरण जावे लागेल. तशी भक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न या नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून करावा लागेल. ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ असे भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे. त्यामुळे भक्त बनून स्वतःचे, समाजाचे आणि देशाचे रक्षण करा !

‘तो’ची मंगल गुढीपाडवा ।

‘तो’ची मंगल गुढीपाडवा ।

गुरूंची आरती सांगते सर्वांना । ज्योतीने ज्योत लावा ।
सर्व विश्‍व ज्ञान प्रकाशमय होईल । ‘तो’ची मंगल गुढीपाडवा ॥

गुढीवरील तांब्याच्या कलशाचे महत्व !

गुढीवरील तांब्याच्या कलशाचे महत्व !

‘तांब्याचा कलश गुढीवर उपडा ठेवावा’ असे धर्मशास्त्र का सांगते ? हे लक्षात येण्यासाठी त्यामागचे अध्यात्मशास्त्रीय विवेचन येथे देत आहोत.

आंब्याच्या पानांचे महत्व

आंब्याच्या पानांचे महत्व

ईश्‍वराकडून प्रक्षेपित होणार्‍या लहरी खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या कोवळ्या पानात ३० टक्के, तर आंब्याच्या परिपक्व पानात १० टक्के असते. कोवळ्या पानात तेजतत्त्व अधिक असते, म्हणून पूजेत आंब्याच्या कोवळ्या पानांचा वापर करावा.

गुढीपाडव्याच्या दिवशी काढावयाची सात्विक रांगोळी

गुढीपाडव्याच्या दिवशी काढावयाची सात्विक रांगोळी

देवतांचे तत्व आकृष्ट करण्याचे सामर्थ्य असणार्‍या सात्विक रांगोळ्या सणांच्या दिवशी काढा !

कडूलिंबाच्या पानांचे महत्व

कडूलिंबाच्या पानांचे महत्व

गुढीला कडूलिंबाची माळ घातली जाते. कडूलिंब हे सत्व लहरींचे प्रतीक आहे. ईश्‍वरी तत्व खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या पानानंतर कडूलिंबाच्या पानात अधिक असते.