डहाणू ते जव्हारपर्यंतची २१ सहस्र २२ झाडे तोडण्याची न्यायालयाची अनुमती !

पालघर – डहाणू ते जव्हार या भागातील २१ सहस्र २२ झाडे तोडण्याची अनुमती मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. पारेषण वाहिन्या टाकण्यासाठी वृक्षतोड करावी लागणार आहे. यासमवेत ९४.६८ हेक्टर वनभूमी, जी आरक्षित आहे, त्याचे आरक्षणही पालटण्यात येणार आहे.