सरकारने पूरग्रस्तांना अल्प साहाय्य केल्याच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन !
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पूरग्रस्तांना अल्प साहाय्य केल्याच्या निषेधार्थ मित्र मंडळ चौक येथे भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पूरग्रस्तांना अल्प साहाय्य केल्याच्या निषेधार्थ मित्र मंडळ चौक येथे भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे मोठी हानी झाली आहे. राज्यात आतापर्यंत ४६ लोकांचा मृत्यू झाला आहे. नैनितालसह अनेक भागांत लोक बेपत्ता असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. नैनिताल जिल्ह्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे.
अर्थतज्ञांनी मांडलेल्या अभ्यासानुसार मराठवाड्यात आलेल्या पुराचे दायित्व कोण घेणार ? तसेच पुरामुळे झालेली हानी कोण भरून देणार ? नागरिकांना झालेला मनस्ताप कोणत्याही गोष्टीने भरून निघणार नाही, तर संबंधितांवर कठोर कारवाई होणार का ?
मराठवाड्यात प्रथमच १४९.१ टक्के पाऊस झाला असून २० लाख हेक्टरवरील उभ्या पिकांची हानी झाली आहे. काही ठिकाणी पिके सडली आहेत. शेतकर्यांची मोठी हानी झाल्याने सरकारने तात्काळ साहाय्य करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील अन् सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यात अतीवृष्टीने झालेल्या हानीची पहाणी करण्यासाठी २८ सप्टेंबर या दिवशी बीड जिल्ह्यात गेले होते. या वेळी परळी येथील नागरिकांनी पाटील यांचे जेसीबीच्या साहाय्याने फुलांचा वर्षाव करत स्वागत केले.
पिकांच्या हानीमुळे शेतकर्यांसमोर मोठे संकट, घरांचीही पडझड ! अतीवृष्टीमुळे अनेक रस्त्यांची वाहतूक बंद ! यवतमाळ येथे पुराच्या पाण्यात एस्.टी. बस वाहून ४ प्रवाशांचा मृत्यू ! बुलढाणा येथे पैनगंगा नदीच्या पुरात दोघे वाहून गेले !
सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील ३ जिल्ह्यांमध्ये अतीवृष्टी अन् महापूर यांमुळे अन्नदाता शेतकर्यांची मोठी हानी झाली आहे. महापूर ही नैसर्गिक आपत्ती आहे कि मानवनिर्मित याचेही संशोधन झाले पाहिजे. मानवी चुका, ढिसाळ नियोजन यांमुळे राष्ट्रीय संपत्तीचीही प्रचंड हानी होते…..
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क शहर आणि उर्वरित भाग येथे एका रात्रीसाठी आणीबाणी घोषित करण्यात आली होती. महानगर परिवहन प्राधिकरणाने सर्व सेवा स्थगित केल्या आहेत.
कधीही पूर न आलेल्या चाळीसगाव येथील ढगफुटी म्हणजे भीषण आपत्काळच होय !
पिकांसह शेती वाहून जाण्याची शक्यता असून नदीवरील पुलाचे संरक्षक लोखंडी कठडे वाहून गेले आहेत. विजेचे खांबही उन्मळून पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे.