
ठाणे – अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी ५० सहस्र रुपयांची लाच घेणार्या भिवंडी निजामपूर शहर महापालिकेच्या २ अधिकार्यांना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (‘एसीबी’च्या) पथकाने अटक केली. साहायक आयुक्त सुनील भोईर आणि प्रभारी बीट निरीक्षक अमोल वारघडे अशी अटक करण्यात आलेल्या लाचखोर अधिकार्यांची नावे आहेत.
भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये ४ मजली इमारतीचे बांधकाम अनधिकृत असल्याचे साहायक आयुक्त सुनील भोईर यांनी सांगितले होते. इमारत बांधणार्या व्यावसायिकाने भोईर यांची भेट घेतली. त्या वेळी कारवाई न करण्यासाठी या व्यावसायिकाकडे त्यांनी दीड लाख रुपयांची मागणी केली.
संपादकीय भूमिका
|