
देहरादून (उत्तराखंड) – काही दिवसांपूर्वी उत्तराखंडच्या चमोलीतील जोशी मठ येथे हिमकडा कोसळून आलेल्या प्रलयानंतर पुन्हा अशी स्थिती येेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येथे हिमकडा तुटल्यानंतर जमा झालेल्या ढिगार्यामुळे ऋषिगंगा नदीचा वरचा प्रवाह थांबला आहे. नदीचा प्रवाह थांबल्यामुळे येथील पाण्याचे तलावात रूपांतर झाले आहे. जर हा तलाव फुटला, तर वेगाने येणार्या पाण्यामुळे पुन्हा प्रलयासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. ‘आय सॅटेलाइट इमेज’ आणि प्रत्यक्ष घटनास्थळी केलेल्या निरीक्षणातून ही माहिती समोर आली आहे.
घटनास्थळी दाखल झालेली शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार ढिगारा आणि चिखल जमा झाल्यामुळे ऋषिगंगा नदीचा प्रवाह थांबला आहे. याचा अर्थ नदीचे पाणी कुठेतरी जमा होत आहे. त्यामुळे तिथे दिसत असलेल्या तलावात किती पाणी आहे, याची माहिती घेणे आवश्यक आहे. जर तलाव मोठे असेल, तर हे तुटल्यानंतर डोंगराखालील भागात महापूर येऊ शकतो. त्यामुळे या तलावातून पाणी काढण्याचा पर्याय शोधावा लागेल.
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !