इयत्ता १२ ची परीक्षा १५ एप्रिलनंतर, तर इयत्ता १० वीची परीक्षा १ मे नंतर होऊ शकते ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

यावर्षी इयत्ता १२ वीची परीक्षा १५ एप्रिलनंतर, तर १० वीची परीक्षा १ मे नंतर होऊ शकते, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. कोरोनामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण आहे. त्यामुळे यावर्षी परीक्षा विलंबानेे घेण्यात येणार आहेत.

बुलढाणा येथे कागदपत्रे मागणार्‍या विद्यार्थ्याचा महिला प्राचार्याकडून शिवीगाळ करून अवमान 

विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणे तर दूरच; पण त्यांना शिवीगाळ करून अवमानित करणारे असे शिक्षक म्हणजे शिक्षण क्षेत्राला कलंकच आहेत.

प्रस्तावित आयआयटी प्रकल्प उभारणारच ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

स्थानिकांचा विरोध असला, तरी शासन शेळ-मेळावली, सत्तरी येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प उभारणार आहे, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे.

वेल्लोर (तमिळनाडू) येथे शिष्यवृत्ती देण्याच्या नावाखाली लोकांना लुटणार्‍या पाद्रयाला अटक

पाद्रयांच्या गुन्हेगारी वृत्तीच्या विरोधात भारतातील प्रसारमाध्यमे नेहमीच मौन बाळगतात; मात्र हिंदूंच्या संतांच्या विरोधातील खोट्या आरोपांना भरभरून प्रसिद्धी देतात, हे लक्षात घ्या !

महाविद्यालये किंवा अभियांत्रिकी महाविद्यालये चालू करण्याचा कोणताही विचार नाही ! – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामुळे पुन्हा कोरोना पसरला जाणार नाही ना ?

आत्महत्येसाठी अनुमती देत नसाल, तर नक्षलवादी होईन !

वडिलांनी शेतीसाठी घेतलेले पीककर्ज न फेडल्याने शिक्षणासाठी धडपडणार्‍या वैभव याला अधिकोषांनी कर्ज नाकारले. पैशांअभावी शिक्षण थांबल्याने निराश होऊन त्याने मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्येची अनुमती मागितली आहे.

भारताचे पहिले शिक्षणमंत्री अबुल कलाम आझाद यांच्या मनात भारताविषयी प्रेम नव्हते !- भाजपचे उत्तरप्रदेशातील मंत्री आनंद स्वरूप शुक्ला

शुक्ला यांचे सरकार सत्तेत असल्याने त्यांनी अबुल कलाम आझाद यांचा चालू असलेला उदो उदो बंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !

पाश्‍चात्त्य शिक्षणपद्धतीचे भारतियांवर झालेले दुष्परिणाम ! 

शिक्षणाच्या पाश्‍चिमात्यकरणाचे फलस्वरूप म्हणून भारतीय कुटुंबव्यवस्था मोडकळीस आलेली आहे. व्यक्ती पूर्णतः स्वार्थी आणि एकांगी होत चालली आहे. आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भारतीय जीवनशैलीला विसरत चाललो आहोत.

विश्‍वविद्यालये आणि महाविद्यालये यांठिकाणी देशी गायीच्या पालनाचे महत्त्व शिकवण्यावर वेबिनारमध्ये चर्चा !

गोपालनाविषयी चर्चा अपेक्षित नसून त्याविषयी तात्काळ कृती करणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित आहे !

कर्नाटकातील ६ वीच्या विज्ञानाच्या पुस्तकातील ब्राह्मणांच्या भावना दुखावणारा धडा भाजप सरकार हटवणार

७ वीच्या पुस्तकातून टिपू सुलतानवरील धडा हटवण्यात आला होता.