शाळांना अनुदान देण्यापूर्वी होणार्‍या पडताळणीसाठी राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाचे पथक कार्यान्वित

मूल्यांकनात पात्र ठरलेल्या खासगी शाळांना अनुदान पात्र घोषित करणे आणि २० टक्के अनुदानाने चालू असलेल्या शाळांना वाढीव अनुदान देणे, असा निर्णय राज्य सरकारने ऑक्टोबर मधील बैठकीत घेतला आहे.

गोवा दंत महाविद्यालयाचे वाढीव शुल्क अखेर मागे

गोवा दंत महाविद्यालयाशी निगडित दोन्ही संस्थांचे वाढीव शुल्क मागे घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली.

शिक्षणक्षेत्रात क्रांती हवी !

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले तरुण शिक्षक रणजितसिंह डिसले यांना प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल टीचर अवॉर्ड’ मिळाला आहे.

गोव्यात पहिली ते नववी आणि इयत्ता ११ वी यांचा शैक्षणिक वर्षाचा निकाल ८ मे २०२१ पर्यंत सिद्ध ठेवण्याचा विद्यालयांना आदेश

पहिली ते नववी आणि इयत्ता ११ वी यांचा शैक्षणिक वर्षाचा निकाल ८ मे २०२१ पर्यंत सिद्ध ठेवण्याचा आदेश शिक्षण संचालनालयाने दिला आहे. शिक्षण संचालनालयाने या आदेशात पुढे म्हटले आहे की, पहिली ते नववी आणि इयत्ता ११ वी यांच्या अंतिम परीक्षांचा निकाल ८ मे २०२१ किंवा त्यांनर घोषित करावा.

तुळशीविवाहाच्या दिवशी विद्यालयांमध्ये ‘घटनादिन’ पाळण्यास सांगितल्याने शिक्षकांमध्ये अप्रसन्नता

तुळशीविवाहाच्या दिवशी घटनादिन साजरा करण्यास सांगण्यात आला. भाजपच्या राज्यात हे अपेक्षित नाही !

अमेरिकेतील विश्‍वविद्यालयामध्ये जैन धर्माचे शिक्षण देण्यात येणार

अमेरिकेतील कॅलिफोर्निया विश्‍वविद्यालयाने जैन धर्माचे शिक्षण देणार्‍या एका अध्ययन पिठाची स्थापना केली आहे.

मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ! – आयुक्त

मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने बृहन्मुंबई महापालिकेने ३१ डिसेंबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत बंद रहातील, असा निर्णय घेण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.

सिंधुदुर्गातील माध्यमिक शिक्षण विभाग ९ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग चालू करण्याच्या सिद्धतेत

राज्यातील ९ वी ते १२ वीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून चालू करण्यात येत आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाने सिद्धता चालू केली असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना पूर्ण करण्यात येत आहेत.

शाळा चालू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा ! – जि.प.चे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांची शिक्षण विभागाकडे मागणी

नववी, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थीवर्गासाठी २३ नोव्हेंबरपासून शाळा चालू करण्याचा राज्यशासनाचा निर्णय हा आत्मघातकी आहे. त्यामुळे होणार्‍या गंभीर परिणामांचा धोका लक्षात घेता, या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा, अशी मागणी शिक्षण विभागाकडे केली आहे.

शिक्षक आणि एस्.टी.चे कर्मचारी यांची कोरोनाशी संबंधित चाचणी करण्यास प्रारंभ

इयत्ता नववी ते अकरावीपर्यंतचे वर्ग चालू करण्यास, तसेच पूर्ण प्रवासी क्षमतेने एस्.टी.ची सेवा चालू करण्यास शासनाने अनुमती दिली आहे. त्यामुळे एस्.टी.चे कर्मचारी आणि माध्यमिक शिक्षक यांच्या कोरोनाशी संबधित चाचण्या जिल्हा अन् तालुका या स्तरांवर चालू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.