कामचुकार प्रशासकीय अधिकार्‍यांवर कारवाईसाठी गोवा सरकार कायद्यात सुधारणा करणार

प्रशासकीय अधिकार्‍यांची नियुक्ती करतांना प्रामाणिकपणा आणि समर्पितभाव यांनाही प्राधान्य द्यावे !

मागील १५ मासांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील १ सहस्र ८४४ महिला-मुली बेपत्ता !

मुली आणि महिला यांनी बेपत्ता होणे, हे गंभीर अन् चिंताजनक आहे. प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी मुलींवर लहानपणापासूनच संस्कार करणे आवश्यक आहे !

(म्हणे) ‘संयोगिताराजे छत्रपती खरे बोलत असून महंत खोटे बोलत आहेत !’ -‘स्वराज संघटने’चे मुख्य प्रवक्ते करण गायकर यांचे विधान

नाशिक येथील काळाराम मंदिरातील पुजार्‍यांकडून छत्रपती घराण्याचा अवमान झाल्याचे प्रकरण नाशिक – छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे यांनी केलेली पोस्ट ही अपप्रवृत्तींच्या विरोधात आहे. त्यात कोणतीही चूक नाही. संयोगिताराजे छत्रपती यांचे बोलणे खरे आहे; पण महंत खोटे बोलत आहेत. महंतांना अवाजवी वक्तव्ये करून प्रकाशझोतात रहाण्याची सवय आहे’, असे वक्तव्य ‘स्वराज संघटने’चे मुख्य प्रवक्ते करण गायकर … Read more

पालघर किनारपट्टीवरील बोटीत पाकिस्तानी नागरिक नसल्याचे स्पष्टीकरण !

 बोटीतील १५ खलाशांच्या आधारकार्डची पडताळणी केली असून त्यात कुणीही पाकिस्तानी नागरिक नाही. याविषयीचे स्पष्टीकरण बोटीला अर्थसाहाय्य करणार्‍या ‘उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थे’ने दिले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या सभेला पोलिसांची सशर्त अनुमती !

ही सभा सायंकाळी ५ ते रात्री ९.४५ या वेळेतच घ्यावी लागेल. सभेचे ठिकाण आणि वेळेत पालट करू नये. सभेसाठी येणार्‍यांनी आक्षेपार्ह घोषणा, हुल्लडबाजी आणि असभ्य वर्तन करू नये. सभेला येतांना शस्त्र बाळगू नये, अशा अटी पोलिसांनी घातल्या आहेत.

खासदार संजय राऊत यांना मिळालेल्या धमकीच्या प्रकरणी पुणे येथून एकाला अटक !

या प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने राहुल तळेकर या संशयित आरोपीला कह्यात घेऊन मुंबई पोलिसांकडे सोपवले आहे. खासदार राऊत यांना ‘दिल्ली में मिल, तुझे एके-४७ से उडा देंगे, सिद्धू मुसेवाला टाइप’ असा धमकीचा संदेश आला होता.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले लिखित ३ शोधनिबंध मार्च २०२३ मध्ये वैज्ञानिक परिषदेमध्ये सादर

सर्व शोधनिबंधांचे लेखक महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, तर सहलेखक ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शॉन क्लार्क (महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन गटाचे मुख्य सदस्य) आहेत.

इंग्रजी भाषेत ‘धर्म’ शब्दाला समानार्थी शब्दही नाही ! असे असतांना ते कधी धर्माचरण करू शकतील का ?

सर्व जगाची स्थिती अन् व्यवस्था उत्तम रहाणे, प्रत्येक प्राणीमात्राची ऐहिक उन्नती, म्हणजे अभ्युदय होणे आणि पारलौकिक उन्नतीही होणे, म्हणजे मोक्ष मिळणे, या तीन गोष्टी साध्य करणार्‍यास ‘धर्म’ असे म्हणतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गडचिरोली येथे चकमकीत १ नक्षलवादी ठार !

येथे पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात मोठी चकमक झाली. त्यात ‘सी – ६०’च्या पोलिसांनी एका नक्षलवाद्याला ठार केले आहे. ही चकमक भामरागड तालुक्यातील कियरकोटी-मुरूमभुशी-कोपरशी जंगलात झाली.

साधनेद्वारे व्यसनाधीनतेवर अल्पावधीत मात करता येते ! – शॉन क्लार्क, फोंडा, गोवा

आध्यात्मिक संशोधनातून असे दिसून आले आहे की, एखाद्या व्यसनांची ३० टक्के कारणे शारीरिक असतात, तर ३० टक्के मानसिक आणि ४० टक्के ही आध्यात्मिक असतात. अध्यात्मशास्त्रानुसार योग्य आध्यात्मिक साधना केल्यास व्यसनावर अल्पावधीत मात करता येते.