नाशिक येथील काळाराम मंदिरातील पुजार्यांकडून छत्रपती घराण्याचा अवमान झाल्याचे प्रकरण

नाशिक – छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे यांनी केलेली पोस्ट ही अपप्रवृत्तींच्या विरोधात आहे. त्यात कोणतीही चूक नाही. संयोगिताराजे छत्रपती यांचे बोलणे खरे आहे; पण महंत खोटे बोलत आहेत. महंतांना अवाजवी वक्तव्ये करून प्रकाशझोतात रहाण्याची सवय आहे’, असे वक्तव्य ‘स्वराज संघटने’चे मुख्य प्रवक्ते करण गायकर यांनी केले.
( सौजन्य : टी व्ही ९मराठी )
सामाजिक माध्यमांवर काळाराम मंदिरातील पुजार्यांकडून छत्रपती घराण्याचा अवमान झाल्याचे लिखाण संयोगिताराजे यांनी प्रसारित केले होते. त्यानंतर वाद निर्माण झाला. यासाठी संघटनेकडून आंदोलन करण्यात येणार होते; पण ‘सध्या मंदिरात श्रीरामनवमी उत्सव चालू असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत आहेत. आमच्या आंदोलनामुळे कुणालाही त्रास होऊ नये, यासाठी आंदोलन मागे घेत आहोत; मात्र संबंधित महंतांनी क्षमा मागावी’, असे पत्रकार परिषदेद्वारे सांगत आंदोलन रहित करण्यात आले.
संपादकीय भूमिका
|
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुभारंभ
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित
आतंकवाद्यांचे समर्थन करणार्यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्याचे कौतुक
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलनाचा ‘अजेंडा’ हाच आहे का ?
जंतरमंतरवरील ‘नौटंकी’ : ‘वोक टूलकिट’चाच आविष्कार !