राज्यातील बसस्थानकांच्या स्वच्छतेची अधिकाऱ्यांकडून केली जाणारी पडताळणी बंदच !

यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यातील स्थापत्य अधिकारी, वाहतूक व्यवस्थापक आणि कामगार अधिकारी या अधिकाऱ्यांकडून बसस्थानकांच्या स्वच्छतेची वेळोवेळी पडताळणी करण्याची कार्यपद्धती होती. सध्या मात्र ही पडताळणी बंद आहे, अशी माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला एस्.टी. महामंडळाच्या एका अधिकाऱ्यांनी दिली.

आजपासून गोव्यात ‘जी २०’ आरोग्य क्षेत्र कार्यगटाची दुसरी बैठक !

या बैठकीत ‘हेल्थ ट्रॅक’ अंतर्गत निवडण्यात आलेले आरोग्यासंदर्भातील आपत्कालीन स्थितीला प्रतिबंध तसेच औषधनिर्मिती क्षेत्रातील सहकार्य बळकट करणे या विषयांवर प्राधान्यावर चर्चा केली जाणार आहे.

स्वस्त धान्य दुकानातील ३ लाख रुपयांचा तांदूळ अन्यत्र विक्रीसाठी नेणाऱ्या वजीर मुजावरला अटक !

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर यमगर्णी येथे स्वस्त धान्य दुकानातील ३ लाख रुपयांचा तांदूळ (१४ टन) कोल्हापूर येथील बाजारपेठेत अधिक दराने विक्रीसाठी नेणाऱ्या ट्रकचालक वजीर नजीर मुजावरला बसवेश्वर चौक पोलिसांनी अटक केली आहे.

अवेळी पडलेल्या पावसाने लातूर जिल्ह्यात टोमॅटो, द्राक्षे आणि फळबागा यांची मोठी हानी !

काही ठराविक अंतरानंतर सातत्याने होत असलेल्या अवकाळी पावसामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आहे. बाजारात शेतमालाला उठाव नाही आणि त्यातच होणारी हानी शेतकऱ्याची आर्थिक घडी तोडणारी आहे.

पलूसचे (जिल्हा सांगली) साक्षात्कारी संत श्री समर्थ धोंडीराज महाराज यांच्या ११५ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !

पलूसचे साक्षात्कारी संत श्री समर्थ धोंडीराज महाराज यांची ११५ वी पुण्यतिथी असून १६ वा रथोत्सव होणार आहे. पारायण आणि पुण्यतिथी महोत्सव २१ एप्रिल ते २९ एप्रिलपर्यंत होत आहे.

बांधकाम व्यावसायिक डी.एस्. कुलकर्णी यांच्यावर सीबीआयकडून २ गुन्हे नोंद !

येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डी.एस्.के.) यांच्या विरोधात सीबीआयने दोन गुन्हे नोंद केले आहेत. त्यांच्यावर ५८० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. १ जुलै २०२० या दिवशी स्टेट बँकेने दिलेल्या पत्राच्या आधारे पहिला गुन्हा नोंद केला आहे.

विश्व हिंदु परिषदेचे प्रांत मंडळाचे मार्गदर्शक सदस्य ह.भ.प. प्रकाश महाराज कठाळे यांचे अपघाती निधन

विश्व हिंदु परिषदेचे प्रांत प्रमुख डॉ. सुरेशराव चिकटे यांनी सांगितले, ‘‘ह.भ.प. प्रकाश महाराज कठाळे यांनी कथा, प्रवचन या माध्यमांतून हिंदूसंघटनासाठी कार्य करून संपूर्ण आयुष्य हिंदु धर्मरक्षणासाठी वेचले. धर्मातील अशी विभूती जाण्याने आध्यात्मिक क्षेत्रात मोठी हानी झाली आहे.’’

नियम मोडून गैरवर्तन करणाऱ्या २ धर्मांधांना अटक !

येथील बैलबाजार परिसरातील हिंद पेट्रोलपंपावर १५ एप्रिलला दुपारी २ वाजता मुकलीस मोहसीन फक्की, जावेद असमत डॉन हे दोघे दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी आले होते. तेथील कामगाराने त्यांना रांगेत येण्यास सांगितल्यावर त्यांनी त्याला मारहाण केली आणि पेट्रोल ओतणाऱ्या पाईपचा ‘नोझल’ खेचला.

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘वाघनखे’ आणि ‘जगदंबा तलवार’ परत करण्याविषयी ब्रिटीश उपउच्चायुक्तांकडून सकारात्मक प्रतिसाद ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

ब्रिटिशांनी लुटून नेलेल्या या दोन्ही गोष्टींना ७५ वर्षांनंतर भारतात आणावे लागत असेल, हे तर केवळ मतांसाठी छत्रपती शिवरायांच्या नावाचा उदोउदो करणार्‍या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद आहे !

सनातनचा साधक कु. अथर्व दिनकर पाटील ‘अभिरूप’ शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम !

चि. अथर्वने हे यश गुरुमाऊलींच्याच कृपेमुळे म्हणजे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याच कृपेमुळेच मिळाले आहे, असे सांगून गुरमाऊलींच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त केली आहे.