रतलाम (मध्यप्रदेश) येथे श्री हनुमानाच्या मूर्तीसमोर महिलांची शरीर सौष्ठव स्पर्धा !

देवतांचा अनादर होणार नाही, याची दक्षता घेणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य आहे ! त्यादृष्टीने प्रत्येक हिंदूने सजग रहायला हवे !

गुजरातमध्ये इराणी बोटीतून ४२५ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त : ५ जणांना अटक

ओखा किनार्‍यापासून ३४० कि.मी. अंतरावर भारतीय जल सीमा क्षेत्रात ही घटना घडली.

राज्यातील सर्व औषधालयांमध्ये ‘जनौषधी कक्ष’ चालू करणार ! – आरोग्यमंत्री विश्वजित राणे, गोवा

आम्ही जनऔषधी दिवसाच्या वेळी गोव्यातील सर्व औषधालयांमध्ये जनऔषधी कक्ष चालू करणार आहोत. येत्या ४८ घंट्यांमध्ये याविषयीचे परिपत्रक काढले जाणार आहे. गोव्यातील अन्न आणि औषध व्यवस्थापनाचे संचालक यावर लक्ष ठेवणार आहेत.

सिंधुदुर्ग : असलदे येथे २ मंदिरांत चोरी,  तर शाळेत चोरीचा प्रयत्न

येथील श्री रामेश्वर मंदिर आणि डामरेवाडी  येथील श्री साईमंदिर येथील दानपेटी फोडून चोरी करण्यात आली, तसेच गावठाण, असलदे येथील प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीतील कपाट तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला.

सावंतवाडी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आदर्श होलिकोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

होळी म्हणजे दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्या माध्यमातून वातावरणाची शुद्धी करणे हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे.

सिंधुदुर्ग : यशवंतगडाच्या तटबंदीनजीक अवैध बांधकाम केल्याच्या प्रकरणी ५ जणांवर गुन्हा नोंद 

प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार नायब तहसीलदार लक्ष्मण महादेव फोवकांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ५ जणांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

६५ जुने कायदे रहित करण्यासाठी संसदेत विधेयक आणणार ! – विधी आणि न्याय मंत्री रिजिजू

२३ वी ‘राष्ट्रकुल विधी परिषद’ ! या परिषदेला ५२ देशांतील ५०० प्रतिनिधी उपस्थित राहिले आहेत. कालबाह्य आणि पुरातन कायदे रहित करण्यासाठी सरकारने व्यापक मोहीम हाती घेतली असून गेल्या ८ वर्षांत १ सहस्र ४८६ जुने कायदे रहित केले आहेत.

सोलापूर येथे कांदा प्रश्नावर जनहित संघटनेचे पालकमंत्र्यांसमोर आंदोलन !

सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत येथील जिल्हा नियोजन भवन येथे विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कांदा उत्पादक शेतकर्‍यांना अनुदान देण्यात यावे, या मागणीचे निवेदन देण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला; मात्र विखे पाटील हे निवेदन न स्वीकारता गेले.

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ कोटी ४१ लाखांची अफूची बोंडे जप्त !

एवढ्या मोठ्या प्रमाणात अफूची शेती होणे धोकादायक आहे. प्रशासनाने असे न होण्यासाठी प्रयत्न करावेत !

मुंबई-गोवा वन्दे भारत एक्सप्रेस चालू होणार ! – रावसाहेब दानवे, रेल्वे राज्यमंत्री

गोवा रेल्वेमार्गावर विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाली असून या मार्गाच्या पहाणी दौर्‍यानंतर मुंबई-गोवा वन्दे भारत एक्सप्रेस चालू करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहे.